आपल्या सरकारने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यत पोहचवा – कपिल पाटील

भिवंडी


भिवंडीत भाजपाची विस्तारीत बैठक संपन्न  

भिवंडी ( प्रतिनिधी ) सार्वत्रिक निवडणुका या फक्त रणनीती करून नव्हे तर कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने जिंकता येतात त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारां पर्यंत पोहचून
आपल्या पक्षाच्या सरकारने केलेलं काम पोहोचवण्याची गरज आहे असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीत झालेल्या बैठकीत केले आहे.
    भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या स्वामीनारायण मंदिर
सभागृहात भाजपा भिवंडी शहर विस्तारित कार्यकारणीच्या बैठक सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रदेश महासचिव अँड.माधवी नाईक,आमदार महेश चौघुले,शहराध्यक्ष हर्षल पाटील,माजी नगरसेवक संतोष शेट्टी,सुमित पाटील,
श्याम अग्रवाल,महिला शहराध्यक्षा सुनीता टावरे व भाजप पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वर पिछेहाट झाल्यानंतर भाजपा कडून भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा बांधण्याची सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचेवतीने मार्गदर्शन कार्यकारणीची विशेष बैठक भिवंडी शहरात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाटील यांनी सांगितले की पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने पक्षाचे व निवडणूकीचे काम करणे आवश्यक आहे.

भिवंडी लोकसभा निवडणुकीत योग्य पद्धतीने काम न झाल्याने सर्वाधिक फटका भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मध्ये उमेदवारांला बसला आहे.निवडणुकीत फक्त मुस्लिम फॅक्टर नव्हे तर दलित आणि आदिवासी फॅक्टर मतदान सुद्धा चालवण्यात विरोधक एकवटले पण आपण एकत्रित आलो नाही ही खंत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी बोलून दाखविली.
भिवंडी शहरात भाजपा 60 टक्के मतांनी मागे आहे .ही उणीव भरून काढण्या साठी कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारापर्यंत पक्षाची भूमिका,राज्य व केंद्र सरकारने केलेला विकास कार्याची माहिती पोहोचवण्याची गरज आहे.कार्यकर्त्यांनी अती आत्मविश्वास ठेऊन काम करू नये असे ही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी संवाद आणि संपर्क वाढवणे गरजेचे असल्याचे सांगत बूथ कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन आपली भूमिका पटवून देऊन विरोधक कसे खोटे पेरत आहेत हे सांगण्याची गरज आहे तरच विजय शक्य असल्याचे मत प्रदेश महासचिव अँड माधवी नाईक यांनी व्यक्त केले. प्रसंगी आमदार महेश चौघुले,शहरध्यक्ष
अँड.हर्षल पाटील यांचेसह मान्यवर यांची सुध्दा समयोचीत भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस राजू गाजेगी तर सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *