————-
आढावा बैठकीत घेतला निर्णय..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्तेना करण्यात आले आहे. तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागावे शिवसेना पक्षाच्यावतीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 90 वार्ड जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी पक्षाच्यावतीने सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी दिली.

शिवसेनेच्या या अचानकपणे घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपासह मित्र पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लवकरच भिवंडी महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने महापालिका प्रशासनाचेवतीने प्रभाग वार्ड रचना काम सुरू झाले आहे.त्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार पक्षाची प्रत्येक वार्डात व प्रभागात मोर्चा बांधणी सुरू केली आहे.त्यामुळे कामाचा आढावा, नियोजन व आगामी निवडणूक अनुषंगाने शहरातील पद्मानगर येथे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या नेतृत्वा खाली व सेनेचे उपनेते
रूपेश म्हात्रे,लोकसभा संपर्क प्रमुख मदन नाईक यांच्या उपस्थितीत आजी व माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस भिवंडी पुर्व विधानसभा मतदारसंघाचे शहरप्रमुख संजय काबुकर,पश्चिम शहरप्रमुख शाम पाटील,मारुती धीर्डे,
नगरसेवक संजय म्हात्रे, कमलाकर पाटील,
शरद धुळे,दिलीप गुळवी,दिपक नागरे यांच्यासह आजी व माजी नगरसेवक,पदाधिकारी
उपस्थित होते.आगामी होणाऱ्या निवडणुकीत सर्वच पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे त्यामुळे शिवसेनेच्यावतीने भिवंडी पालिका कार्यक्षेत्रातील 90 वार्डांची चाचपणी आढावा घेतला जात असुन सर्वच जागा लढविण्यासाठी तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी दिली.सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक शिवसेना लढविणार असल्याची माहिती थळे यांनी दिली.पालिकेचे आजी व माजी नगरसेवक,महिला संघटीका व पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागाचा आढावा घेऊन कामाला सुरुवात करावी असे आवाहन लोकसभा संपर्क प्रमुख मदन नाईक व सेनेचे उपनेते रूपेश म्हात्रे यांनी बैठकीत केले.यावेळी प्रास्थाविक भाषणात शहरप्रमुख शाम पाटील यांनी प्रभाग रचना व संघटना संदर्भात माहिती देत सर्वानी एकत्रितपणे काम करावे व शिवसंपर्क मोहीम राबविण्यात यावी विजय आपलाच आहे असे आवाहन केले.