लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक
भिवंडी (बी.एस.) भिवंडी तालुक्यातील कोनगांव परिसरातील सरवली एम आय डी सी येथील कापडी डायपर बनविणाऱ्या कंपनीला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली त्यामुळे परिसरात मोठा हल्लकोळ निर्माण झाला होता.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग सात तासात आटोक्यात आणून भिजवली आहे.मात्र या आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे.
पोलिसांनी याआधी संदर्भात नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केला आहे

भिवंडी – कल्याण महामार्गावरील सरवली गाव परिसरात असलेल्या एमआयडीसी मध्ये सदाशिव हायजिन प्रा.ली नामक कंपनी असुन येथे कापडी डायपर बनविण्यात येतात आज मंगळवार पहाटे तीन वाजताच्या सुमारास कंपनीला भिषण आग लागली त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून आरडा ओरड सुरू झाली.तळ अधिक तीन मजली या कंपनी इमारतीं मध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस ,कपडा व प्लास्टिक याचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर साठवला असल्याने पाहता पाहता ही आग सर्वत्र पसरली या आगीच्या ज्वालांनी रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण इमारत आगीने व्यापली गेली.घटनेची माहिती मिळताच भिवंडी,ठाणे, कल्याण येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन लागलेली भीषण आग विझवण्यास सुरुवात केली आगीची व्याप्ती वाढल्याने पाण्याची कमतरता भासत होती. त्यामुळे आग विझविण्यात अडथळा येत होता.मात्र पाण्याचे टँकर उपलब्ध झाल्याने सुमारे सात तासांनी आग आटोक्यात आणून अग्निशामक दलाच्या जवानांनी आग शांत केली. ही आग कशा मुळे लागली हे अजून हे स्पष्ट झालेले नाही. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र लाखो रुपये किमंतीची मालमत्ता व साहित्य जळून खाक झाले आहे.पोलिसांनी या आगी संदर्भात नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केली आहे.
