भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यात २०१८ पासून ३० हून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली असतानाच पाकिस्तानी नागरिकांचा भिवंडीत वावर असल्याचा खळबळजनकपणे प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भिवंडी शांतीनगर पोलिसांनी गंभीर दखल घेत ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांनी दिली.तसेच याबाबत न्यायालय आदेशा नुसार सविस्तर चौकशी सुरू असुन अद्याप कोणाला अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
हारुन उमर परकार,अस्लम उमर परकार,आशिक अब्दुल रहमान परकार, अल्लाउददीन अब्दुल्लाह परकार,नाजीम कुरैशी,अशफाक अहमद मुशताक हाशमी,इजाज अहमद मुशताक हाशमी,हुसैन मेहमुद खान,रौफ हुसैन परकार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हारून आणि अस्लम हे दोघे भिवंडीत १९७१ पासून वास्तव्यास आहेत.आणि ते दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याचे माहीत असतानाही वरील ७ जणांनी त्यांना बनावट ओळखपत्र, व इतर कागदपत्र बनवुन देवून अवैधरित्या हारून व अस्लमला भारतात प्रवेश करुन देवुन भारताच्या सुरक्षिततेस धोका निर्माण केला आहे. त्यामुळे संशयावरून या सर्वांवर ५ जून रोजी शांतीनगर पोलिस ठाण्यात असगर अली मोहम्मद अली अन्सारी यांच्या फिर्यादीवरून परदेशी नागरी कायदा फसवणुकीसह पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे करीत आहेत.
