लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक.
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुनीसुरत कॉम्प्लेक्स मधील एका इमारती मधील दुकान गोदामात साठवणूक करण्यात आलेल्या फर्निचर,लाकडी प्लायवूड मालाच्या साधन सामुग्रीला आज शनिवारी पहाटे भीषण आग लागली त्यामुळे परिसरात राहणारे रहिवासी व कामगार वर्गाची धावपळ उडाली होती.ठाणे, कल्याण व भिवंडी महा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रासायनिक द्रव्य निश्चित पाण्याचा मारा करीत ही आग 13 तासांनी आटोक्यात आणून शांत केली आहे.या आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे.या दुघँटनेत एक जवान जखमी झाला आहे.पोलिसांनी नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.

भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा,राहनाळ, पूर्णा,कोपर,दापोडा, काल्हेर,कशेळी अशा विविध ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट मालाची साठवणूक केलेली गोदाम आहेत,या गोदामा मध्ये
राजस्थान,सुरत,गुजरात,
मद्रास,हैदराबाद,पश्चिम बंगाल तसेच महाराष्ट्रातील मुंबई,छत्रपती संभाजीनगर,पुणे,नाशिक अशा विविध मोठ्या राज्यातून व शहरातून येणाऱ्या विविध प्रकारचा सामान व रासायनिक ज्वलनशील द्रव्य,पावडर मालाची साठवणूक केली जाते,यातील बहुतांश गोदामांमध्ये अग्निप्रतिबंधक अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असतात राज्य शासन व पोलीस प्रशासनाकडे कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रार केल्या आहेत मात्र त्याकडे सराईतपणे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक वेळा मोठ्या दुर्घटना येथे होत आहे,आज राहनाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या भिवंडी – ठाणे महामार्गावरील अंजुरफाटा मुनीसुरत स्वागत कंपाऊंडमध्ये असलेल्या एका इमारती मधील लाकडी प्लायऊड,
कपडा व फर्निचरचे साठवणूक केलेल्या दुकान गोदामाला भीषण आग लागली वेळेत अग्निशमन दल पोहचण्याचे आधीच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीच्या ज्वाळा सर्वत्र पसरवत होत्या,त्यामुळे परिसरात राहणारे नागरिक व कामगार वर्गाची धावपळ उडाली होती पोलीस व भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ही आग सर्वत्र पसरत होती,आगीमुळे काळाकुट्ट धुर सर्वत्र पसरत असल्याने अनेकांना खोकल्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले ही आग विझवण्यासाठी जवानांनी पाण्यामध्ये रासायनिक द्रव्याचा वापर करून ही आग सुमारे 13 तासात आटोक्यात आणून शांत केली आहे,ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्याचे जवानांनी यावेळी सांगितले नारपोली पोलिसांनी याआधी संदर्भात नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केला आहे.