वोट जिहाद’लावोट यज्ञ’ने चोख उत्तर देणार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत परखड इशारा

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून वोट जिहाद' घडविले जात आहे. त्यालावोट यज्ञ’ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त वोट' एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्येसमिधा’ म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे  भिवंडीत झालेल्या सभेत व्यक्त केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे परखड इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. या सभेला महिलांसह मतदार व भाजप महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती.


          भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना  महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजुरफाटा येथे आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित,भाजपाचे आमदार महेश चौगुले,
आ.निरंजन डावखरे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शिवसेनेचे शहरप्रमुख सुभाष माने, मनोज काटेकर, भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी,निलेश चौधरी मनसेचे मनोज गुळवी आदींसह महायुतीचे मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी मतदान करा, असे कोणी सांगत असेल, त्यांना जो मोदी का नही, वो हमारे काम का नही', असे उत्तर द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाभारतातील लढाईचा संदर्भ देत इंडी आघाडीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे कौरव जमा झाले असून या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तरवोट’ ने उत्तर दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले. यंदाची निवडणूक ही जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा निवडीची आहे, असे श्री.फडणवीस यांनी नमूद केले
भिवंडी शहराचा २०१४ पासून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार महेश चौगुले यांच्याकडून विकास केला जात आहे. एकेकाळी भिवंडी हा अप्रगत भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, येथील नागरिकांनी भाजपाला मत दिल्यामुळे भिवंडी शहराचा चेहरामोहरा बदलला, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.कपिल पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध मान्यवर यांनी सुध्दा आपली मनोगत भाषणातून कपिल पाटील यांना विजय करण्याचे आवाहन केले.कार्यक्रम सुत्रसंचालन मानसी राजे यांनी केले.

श्यामा-श्याम सत्संग समितीचा
भिवंडीत कपिल पाटील यांना पाठिंबा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये भिवंडीतील अग्रगण्य श्यामा-श्याम सत्संग समितीने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या कार्याबद्दल आनंद व्यक्त करून मला पाठिंबा दिला. या वेळी समितीचे अध्यक्ष श्यामबाबू गुप्ता, उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, महासचिव सत्यनारायण लोहिया, सचिव प्रशांत धुमाळ, खजिनदार भरत शहा यांच्यासह समितीचे सत्संगी उपस्थित होते.
चौकट
देवेंद्र फडणवीसांच्या ११५ व्या सभेने
भिवंडीत प्रचाराचा समारोप देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत देशभरासह महाराष्ट्रात ११५ सभा घेतल्या. भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारावेळी झालेल्या सभेत  फडणवीस यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यात महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *