भिवंडी ( प्रतिनिधी ) काँग्रेस पक्षाने सातत्याने सामाजिक न्यायाची भूमिका घेतली असून सर्व जात समुहाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे अशी आग्रही भूमिका काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडली होती यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी संसदेत लावून धरली होती.भाजपाचा त्यांच्या भूमिकेला विरोध होता पण उशिरा का होईना मोदी सरकारला जाग आली आहे,राहुल गांधींच्या रेटया मुळेच मोदी सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे.राहुल गांधी यांच्या संघर्ष व विचारधारेचा हा विजय असून या निर्णयाचे स्वागतच आहे.राहुल यांचा पाठपुरावा व केंद्र सरकारचा निर्णय यामुळे देशभरातील ओबीसी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची वाट मोकळी होणार असल्याचे परखड मत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
जातनिहाय जनगणनेमुळे सर्व समाज घटकांना विकासात योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल.
काँग्रेस पक्षाने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. राहुलजी गांधी यांनी यासाठी मोठा संघर्ष केला असून पुन्हा त्यांच्या दूरदृष्टीचा अनुभव देशाला व सरकारला आला आहे.भाजप पक्षाचा ओबीसी आरक्षणाला पूर्णपणे विरोध होता मात्र काँग्रेस पक्षाने संसदेत व संसदे बाहेरही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरल्याने केंद्र
सरकारला जात
निहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संघर्षाचा व विचारधारेचा हा विजय असला तरी हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आम्ही केंद्र सरकारची ही आभार व्यक्त करतो असेही दयानंद चोरघे यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी याआधीही जे मुद्दे मांडले त्याकडे अहंकारी तानाशाही सरकारने दुर्लक्ष केले होते पण नंतर राहुलजी यांची भूमिकाच योग्य होती असे स्पष्ट झाले आहे. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने पुन्हा तेच सिद्ध झाले आहे,असे मत दयानंद चोरघे यांनी व्यक्त केले आहे.
