भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी रस्त्यावरील खड्डयात झाडे लाऊन केले निषेध आंदोलन..

भिवंडी




भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी – वाडा या महामार्गावर राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च  करूनही निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात व वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या हा महामार्ग मृत्यूचा सापळा व भ्रष्टाचारचा महामार्ग झाला आहे. काही वर्षांत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असला तरी या रस्त्याची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे.त्यामुळे प्रवासी विद्यार्थी,नोकरदारवर्ग व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत या रस्त्या संदर्भात वारंवार शासन स्तरावर तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर आज काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी भिवंडी वाडा महामार्गावरील दुगाड गांव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करीत शासन कारभाराचा  निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.
    भिवंडी – वाडा या 40 कि.मी. अंतर असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे या खराब रस्त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक अपघात व वाहतूक कोंडी चे प्रश्न निर्माण झाले आहेत.वाडा येथे जाण्यासाठी दिड ते दोन तास लागत आहेत.त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.राज्य शासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्च केला आहे मात्र ठेकेदाराने तकलादू पद्धतीने काम केल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडे वारंवार स्थानिक ग्रामस्थ व काँग्रेस पक्षाच्या वतीने तक्रारी करण्यात आले आहे मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करत असल्याची माहिती चोरघे यांनी दिली.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी यावेळी खराब झालेल्या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशरम जातीची झाडे लाऊन शासन व प्रशासन यांच्या विरोधात
ग्रामस्थांनी व उपस्थित काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
यावेळी भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आलेल्या प्रतिनिधीने जिल्हा काँग्रेसचे निवेदन स्वीकारले,यावेळी शरद ठाकरे,निलेश भोईर,सोहेल खान,
माजी उपसभापती महेश धानके,शहापूर तालुका अध्यक्ष जितेश विशे,कल्पेश पाटील,संदेश वखारे,मुदसशील पटेल,सदानंद शेळके,
संजय गायकवाड यांच्यासह भिवंडी ग्रामीण मधील काँग्रेस कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
चौकट
राज्याचे मुख्यमंत्री,
जिल्ह्याचे पालकमंत्री,
राज्य व केंद्र सरकार रस्त्यांचा गलथान कारभाराला
जबाबदार असून वेळीच दखल न घेतल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी यावेळी दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *