भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील श्री भैरव सेवा समिती, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी सहेली, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी युथ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विशेषत: थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर येथील भैरव नेत्र रुग्णालय येथे संपन्न झाले.

जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडीचे माजी अध्यक्ष गगन जैन यांच्या पुढाकाराने आयोजित शिबीर कार्यक्रमास,जयानंद केणी,मनोहर पालन,जायंट्स फेडरेशन 1C चे अध्यक्ष डॉ.नूर खान,डॉ.कमल जैन,पत्रकार व्ही.के.सिंग,श्री भैरव सेवा समिती, अनिल जैन आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात एकूण १२० जणांनी रक्तदान करून समाजात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.अशी माहिती माजी अध्यक्ष गगन जैन, सदानंद केणी यांनी दिली. मुंबई शहरात ४००० हून अधिक थॅलेसेमियाग्रस्त मुले-मुली आहेत. त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी दर महिन्याला २ युनिट रक्त लागते. आजचे रक्तदान थॅलेसेमियाग्रस्त बालकांना जीवनदान देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सर्व थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना “धन्यवाद पत्र” देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी आयुष्यात ६० वेळा रक्तदान करणारे सामाजिक कार्यकर्ते भरत कृष्णा शेटे (अप्पी) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडीचे अध्यक्ष सदानंद केणी, डी.ए.कल्पेश शहा, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी सहेलीच्या अध्यक्षा पूनम केणी,काजल जनयानी डी.ए.खिलना शहा, मोईनुद्दीन अन्सारी, डी.ए. माटोलिया,सुरेंद्र गोगड, अमित छाजेड ग्रुप सदस्यांचे महत्त्वाचे योगदान होते.तसेच श्री भैरव सेवा समिती, भैरव धर्मादाय नेत्र रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.