भिवंडी ( प्रतिनिधी) एएमआयएम पक्ष भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्या बाबत गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.भिवंडी मतदारसंघात निवडणुकीस अजून वेळ आहे असे सांगून
एएमआयएम पक्ष पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता व माजी आमदार वारीस पठाण यांनी निवडणूक लढविण्या संदर्भात संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
भिवंडी शहरात एएमआयएम पक्षातर्फे ईद ए मिलाद हा कार्यक्रम अवचित पाडा याभागात आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.या प्रसंगी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी,अँड.अमोल कांबळे,शेरूभाई शेख,अबु ताहीर आझमी यांच्यासह मोठ्या संख्येनं पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदार संघांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षाची ताकद आहे.तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम समाज मतदार आहेत.काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा न करता राष्ट्रवादी उमेदवारास पाठिंबा देत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षात कलह निर्माण झाला आहे.त्यामुळे आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी या निवडणुकीत ए एम आय एम पक्ष आपला उमेदवार उभा करणार अशी चर्चा काही दिवसां पासून सुरू आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख खालिद गुड्डू यांचे व समर्थकांचे दोन्ही मतदारसंघात प्राबल्य आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र पक्षाने निवडणूक संदर्भात अजून ठोस भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सविधानाने सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला असल्याने आम्ही जिंकण्यासाठी लढत असतो त्यामुळे आम्ही कोणाची ही बी टीम म्हणून काम करीत नसून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना अकोला येथे तर अमरावती येथे आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे अशी माहिती वारीस पठाण यांनी दिली.
