भरघोस मतदानामुळे भिवंडीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा जोरदार चर्चा सुरू

भिवंडी


भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात 12 लाखाहून अधिक उस्फूर्तपणे मतदान झाल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदी आनंद वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा जातीय समीकरण झाल्याने अटीतटीचा सामना होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत,
भाजपा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळामामा ) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघां मध्ये जोरदार टक्कर झाल्याची  चर्चा गावातील चौका चौकात सुरू झाली आहे.त्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांचे लक्ष लागले आहे.


काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्याची माळ वाजवून विजयाचे दावे सुरू केले आहेत. मात्र 4 जून मतमोजणी नंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
      भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 दिवसापासून राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी भाषण व घोषणाबाजी करीत प्रचाराची रणधुमाळी माजवली होती त्यामुळे या निवडणुकीला एक आगळे वेगळे काही प्रमाणात तणावपूर्ण स्वरूप प्राप्त झाले होते.मात्र शांतता पूर्ण वातावरणात निवडणूक संपन्न होण्यासाठी  ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी व ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.डी.एस.स्वामी यांच्या विशेष पोलीस पथकाने मतदान केंद्र परिसरावर गस्त घालून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने संपन्न झाली भाजपा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळा मामा ) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यासह 27 उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले आहे.राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळमामा) म्हात्रे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार,आप पक्षाचे अरविंद केजरीवाल तर भाजप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
व अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यासाठी वंचित चे प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडीत प्रचार सभा घेऊन आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे या निवडणुकीला फार मोठे महत्त्व निर्माण झाले होते. पोलीस बंदोबस्तात भिवंडीतील स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या बंदिस्त ठेवण्यात  आल्या आहेत.भिवंडी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सुमारे 59.89 मतदान झाले असून सुमारे बारा लाखा अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.येत्या 24 जुन रोजी मतमोजणी भिवंडी तालुक्यातील सावद गांव परिसरातील संकुल येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता मतमोजणी नंतर कोणाच्या गळयात विजय माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *