भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचा कार्यक्षेत्रातभटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने शालेय विद्यार्थी सह नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.महापालिकेच्या आयुक्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कुत्र्यां वरील निर्बिजीकरणाचा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे.त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असून श्वानदंश होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.आयुक्तांनी याबाबत लक्ष्य दयावे अशी मागणी होत आहे.

भिवंडी पालिकेच्या सण २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात निर्बीजीकरणावर ३० लाखांची तरतूद करण्यात आली होती तर यावर्षी २०२४-२५ च्या अर्थसंककल्पात ५० लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.पालिका प्रशासन निर्बीणीकरणासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी लाखोंची तरतूद करत आहे.पण निर्बीजीकरण प्रकल्प बाबतीत उदासीन आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचावावर वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. श्वानदंशाचे प्रमाण वाढ असून फेब्रुवारी महिन्या श्वानदंशच्या ९४६ घटना शहरात घडला असल्याची नोंद उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असल्याची माहिती स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.माधवी पंदारे यांनी दिली आहे.पालिकेने भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरण करणे व त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे बाबतचा प्रकल्प सन २००४ सालात सुरू केला पण नंतर तो बंद झाला.हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा अशी मागणी होती.मात्र पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्याने निर्बिजीकरण प्रकल्प सध्या बंद आहे.भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने अंदाजे 10 हजारांहून अधिकसंख्या असल्याचे सांगण्यात आले.भटकी कुत्री रात्रीच्या वेळी झुंडीने रस्त्यावर फिरत असून वाहन चालकांचा पाठलाग करीत त्यांना दंश करीत आहेत.

तसेच रात्री वेळी-अवेळी भुंकून नागरिकांची झोपमोड करीत आहेत.नागरिकांना भटकी कुत्री चावण्याचे प्रमाण देखील वाढले असून दर महिन्याला शहरात सुमारे 600 हुन अधिक नागरिकांना भटकी कुत्री चावत असल्याची नोंद स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात होत असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.
श्वान निर्बिजीकरण प्रकल्प संदर्भात संपूर्ण शासन स्तरावर माहिती घेऊन हा प्रकल्प निश्चितच सुरु करण्यात येणार असून त्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे अशी प्रतिक्रिया मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त दिपक झिंजाड यांनी दिली आहे.