अल्पसंख्यांक महिलांना प्रतिनिधत्व देण्याची मागणी
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना डावलून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते.भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद मजबूत असताना आता इतर पक्षाचे वर्चस्व वाढत आहे.त्यामुळे भिवंडी लोकसभा परिक्षेत्र व कोकण विभागात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आगामी होणाऱ्या विधानपरिषद (M.L.C.) निवडणुकीसाठी मुस्लिम समाजातील महिला प्रतिनिधीला प्राधान्य देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती आस्मा जव्वाद चिखलेकर यांना काँग्रेस पक्षाकडून
उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष
जव्वाद चिखलेकर यांनी केली आहे. या संदर्भातील प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांची शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेऊन लेखी निवेदन पत्र दिले आहे.
भिवंडी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान झाल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कोकण परिक्षेत्रात व ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी नसल्याने आता या क्षेत्रात मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जोरदार मोर्चा बांधणी सुरू झाली आहे.कोकण व ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष क्रियाशील सदस्या आस्मा जव्वाद चिखलेकर यांना महिला म्हणून प्रथम प्राधान्याने विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्याक समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.आस्मा चिखलेकर यांनी
यांनी पदवीधर निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मागितली होती,परंतु ती जागा अन्य व्यक्तीला देण्यात आली त्यामुळे प्रदेश अध्यक्षाचे निर्देशानुसार आस्मा यांनी उमेदवारी फॉर्म मागे घेत पक्षाचे आदेशाचे पालन केले आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण, भिवंडी मध्ये आजपर्यंत पक्षाचे कोणालाही विधान परिषद उमेदवारी मुस्लिम समाजाला देण्यात आलेली नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.सदर नाराजी दुर करण्याकरिता व कांग्रेस पक्ष कोकण व ठाणे जिल्हा आणि भिवंडी मध्ये बळकट आस्मा चिखलेकर यांना विधान
परिषदेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष जव्वाद चिखलेकर यांनी केली आहे.आगामी विधानसभा, महानगर पालिका,नगरपरिषद, नगरपंचायत,जिल्हापरिषद व पंचायत समिती मध्ये आपल्या पक्षाची सत्ता आणण्याकरीता
मुस्लिम समाज महिला म्हणून आस्मा चिखलेकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी
जव्वाद चिखलेकर यांनी केली आहे.