भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी बायपास – मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे खराब रस्ता व खड्डयामुळे या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहन चालकासह प्रवासी नागरिक, विद्यार्थी व नोकरदार वर्गाला सोसावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या महामार्गावरील
प्रवासा यातनामय झालेला आहे.

ठाणे व मुंबई कडे तसेच मुंबईहुन नाशिक कडे प्रवासाकरिता सात ते आठ तास लागत असल्याची आरडाओरडा सुरू झाली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी दखल घेत महामार्ग संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आज शुक्रवारी स्वतः एकनाथ शिंदे यांनी भिवंडी ग्रामीण आमदार व अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे निर्देश देत खड्डे भरणे चे काम प्रात्यक्षिक स्वतः पाहिले.या वेळी आमदार शांताराम मोरे, शिवसेना शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभाग,एम.एम.आरडी.ए चे आयुक्त संजय मुखर्जी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

या महामार्गावर अवजड वाहनांची मालवाहू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.ही कोंडी सोडवण्यासाठी काही वेळेत ही वाहन पार्किंग झोन मध्ये थांबवून वाहतूक महामार्गावर सुरळीत झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्यांना रस्त्यावर मार्ग येण्याची देण्याची मुभा देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.कल्याण पडघा,तलवली फाटा व खडवली नाका या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याच्या सूचना संबंधित विभागांना त्यांनी दिल्याचे सांगितले, या महामार्गावरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भरले जाणार असल्याने हे खड्डे भरल्या नंतर काही तासात वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.