शांताराम मोरे विजयाची हॅट्रिक करतील विश्वास व्यक्त केला.
भिवंडी ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाचा ध्यास घेतला असून महायुतीचे सरकार आल्यानंतर भिवंडी शहर व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार उमेदवार शांताराम मोरे यांना मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केले आहे,शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असुन ठिकठिकाणी प्रचार रँली काढून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महायुतीच्या वतीने आमदार शांताराम मोरे हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या हस्ते नारळ वाढवून
सुरवात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते अरूण पाटील,तालुका प्रमुख श्रीधर खारीक,संतोष लाटे,रत्नाकर जाधव, संजय भोईर,सपना पाटील,प्रदिप भोईर उपस्थित होते.

आमदार शांताराम मोरे यांनी ग्रामीण भागात पाणी, रस्ते,शाळा,आरोग्य व्यवस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार अथक मेहनत घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे,त्यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकास कामामुळे त्यामुळे ते पुन्हा मतदारांच्या आशीर्वादाने विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी व्यक्त केला पडघा,अनगांव गणेशपुरी,दाभाड,
अंबाडी अशा विविध भागातील महिला व युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी प्रचार रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.शिवसेना उपनेते,प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात शिवसैनिकांनी जोरदार प्रचार यंत्रणा सुरू केली असुन मतदारांशी थेट संपर्क साधून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे.