मोबाईल चोरीच्या संशयावरून भिवंडीत तरुणाची निर्घृण हत्या करणारे आरोपी गजाआड.

भिवंडी



भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरात मोबाईल चोरीचा संशयावरून एका युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटने नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिताफीने तपास करीत अवघ्या तीन तासात हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवून सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
   भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद नगर राहुल हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पाईपलाईन जवळील रस्त्यालगत एक अनोळखी व्यक्तीची कोणीतरी अज्ञात कारणावरून हत्या केल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवारी रात्री उघडकीस आली त्यामुळे भिवंडी शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,
पोलिस निरीक्षक विनोद पाटील,अतुल अडुरकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी परिसरात माहिती घेत त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला असता त्याचं नाव मोहम्मद रहमत शहा आलम (वय 20 वर्षे रा.कलकत्ता पश्चिम बंगाल) असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे व सर्जेराव पाटील,
पोलिस कर्मचारी रिजवान सैय्यद,
काळूराम शिरोसे, संतोष पवार,किरण जाधव,दिनेश भुरकुट,श्रीकांत पाटील,दीपक सानप,प्रशांत बर्वे,मनोज मुके,रोशन जाधव,रवींद्र पाटील या पोलीस पथकाने मिळालेली माहिती व
मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवून अरमान अन्सारी या मुख्य आरोपी सोबत त्याचे पाच ते सात आरोपी यांना ताब्यात घेत त्यांच्या कडे कसून चौकशी केल्या नंतर मोबाईल चोरीच्या संशयावरून लाकडी मारदांड्याने त्यास बेदम मारहाण करून जीवे ठार मारले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.त्यामुळे पोलीस गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.या गुन्हयात अजून काही आरोपी असून त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे पोलिस पथक रवाना केले आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी  दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *