भिवंडी लोकसभेतील पराभवाबाबत भाजपाकडून आढावा बैठक.

भिवंडी

 

निरीक्षकांनी पदाधिकाऱ्याना  कानपिचक्या देत चर्चा

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा झालेल्या पराभवा मुळे कार्यकर्ते व पदाधिकारी तीव्र नाराज झाले आहेत.
त्यामुळे पक्षाचे निरीक्षक व माजी खासदार गोपाळ शेट्टी व प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर थेट चर्चा करून पक्षाच्या झालेल्या पि‍छेहाटीची कारणे जाणून घेत पक्ष कामाचा आढावा घेऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तेना शब्द कानपिचक्या देत मार्गदर्शन करुन शाब्दिक खरडपट्टी काढली.तसेच संसदेत शपथ घेताना असदुद्दीन ओवैसी घेतलेली शपथ ही चुकीची आहे. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन शेट्टी यांनी बैठकीत व्यक्त केले.

भाजप पक्षाकडून भिवंडी मतदारसंघात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी व पराभवाची कारणीमिमासा जाणून घेण्यासाठी पक्षाचे निरीक्षक व माजी खासदार गोपाळ शेट्टी व प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील,माजी आमदार नरेंद्र पवार, विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, प्रदेश सदस्य भरत पाटील,ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, भिवंडी शहरध्यक्ष हर्षल पाटील, भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, जितेंद्र डाकी आदी उपस्थित होते. देशात खोटे नरेटिव्ह निर्माण करून तयार केलेल्या समीकरणांचा परिणाम भिवंडी मतदारसंघात झाला.भाजपासह महायुतीचा खूप कमी मतांनी पराभव झाला असून,आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न करण्यात येईल, असे गोपाळ शेट्टी यांनी यावेळी सांगितले. भारताची आत्मा असलेल्या बहुसंख्य लोकांची अवहेलना होत होती. या समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपाच्या स्थापनेपासून केला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षात काही प्रमाणात अवहेलना दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही लोकांनी खोटा प्रचार करून त्यांना मोठ्या विजयापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही आता आपल्या विचारांच्या व राष्ट्रहिताच्या लोकांनी एकत्र करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. संसदेत शपथ घेताना असदुद्दीन ओवैसी घेतलेली शपथ ही चुकीची आहे.अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
चौकट
ठाणे जिल्ह्याला दिलेले मंत्रिपद
नागरिकांनी लक्षात ठेवले नाही
देशाच्या इतिहासात ७५ वर्षात ठाणे जिल्हा व आगरी समाजाला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपिल पाटील यांना मंत्रीपदाची संधी दिली. कपिल पाटील यांनीही विकास कार्यासाठी परिश्रम घेतले. मात्र, या जिल्ह्यातील सकारात्मक विचार करणाऱ्या नागरिकांनी नेता व पक्ष पाहिला नाही. ज्या गोष्टी नको पाहायला होत्या, त्या पाहिल्या. कपिल पाटील यांना दिलेले मंत्रीपद लोकांनी लक्षात ठेवले नाही, अशी खंत मत माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *