भिवंडी पालिका आयुक्त पदाचा अनमोल सागर यांनी कार्यभार स्विकारला

भिवंडी


कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – आयुक्तांनी बैठकीत दिला इशारा..

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी  शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी आज बुधवार रोजी सकाळी पालिका मुख्यालयात येऊन आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला.
प्रसंगी अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,देविदास पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यानंतर आयुक्त सागर यांनी पालिकेचे सर्व विभाग प्रमुख व नियंत्रण अधिकारी यांची बैठक
घेत सर्वाचा व आपला परिचय दिला. यापुढे सर्वांनी मिळून काम करावयाचे असून, जनमानसात पालिकेची एक चांगली व सकारात्मक प्रतिमा तयार करण्याबाबत भाष्य केले. प्रत्येक कर्मचारी,
अधिकाऱ्याने त्याच्या कामात शिस्त प्रामाणिकपणा पाळलाच पाहिजे असे मत आयुक्त
सागर यांनी व्यक्त केले.पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम हे वेळेतच आणि गुणवत्तापुर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचा कामाच्या गुणवत्ते मधील जाणीवपुर्वक हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा आयुक्तांनी या बैठकीत दिला. तसेच, महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आणि कर वसुली 100%  करणे यावरच लक्ष केंद्रीत करण्याचे अधिकाऱ्यांना
सूचित केले.कोणत्याही प्रकारे पालिकेच्या पैशाचा अपव्यय सहन केला जाणार असे ही परखड मत त्यांनी व्यक्त केले.
विविध विभागात एखाद्या कामाबाबत जी संदिग्धता दिसुन येते, किंवा काम कोणी करावे याबाबत संभ्रम निर्माण होतो त्या सर्व गोष्टी दुरूस्त करुन त्यात एकसुत्रीपणा आणणे गरजेचे आहे.असे नमुद करीत ते म्हणाले की,या पुढे आपले नियमीत कामासोबतच प्रत्येक विभागाने एक नाविन्यपुर्ण प्रकल्प सादर करावा. त्यावर विचार विनीमय करुन ते काम पुर्णत्वास नेले जाईल.मी जे काम सोपवितो त्याचा सातत्याने काम पुर्ण होईपर्यंत पाठपुरावा त्यामुळे प्रत्येकाने नियमानुसार काम करावे प्रत्येक विभागाने त्यांचे विभागाचे तातडीचे प्रश्न,दिर्घकालीन प्रश्न काही असतील तर ते सादर करावे. त्यावर मार्ग काढून त्यांचे निराकरण केले जाईल.काम प्रस्तावित असल्यास ते तातडीने निदर्शनास आणून दयावेतअशा सूचना देखील त्यांनी दिल्या,जे अधिकारी जाणीवपुर्वक एखादे काम करण्यास टाळाटाळ करीत असतील त्यांना मात्र कोणत्याही प्रकारे क्षमा केली जाणार नाही असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा गौरव करणे आणि सदैव त्यांचा पाठीशी उभे रहाण्याची ग्वाही आयुक्त अनमोल सागर यांनी यावेळी दिली.नागरीकांकरिता आठवड्याचे पाचही दिवस पुर्णवेळ उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *