महाराष्ट्रात कडवट हिंदुत्ववादी सरकार,घाबरण्याचे कारण नाही – नितेश राणे

भिवंडी


भिवंडीतील कार्यक्रम वक्तव्य..


भिवंडी (प्रतिनिधी ) महाराष्ट्रात कडवट हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे त्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही वळवळ करणाऱ्या जिहादी समाजकंटकांना ठेचून काढण्यास आम्ही समर्थ आहोत असे परखड मत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भिवंडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.तसेच आ.नीलम गोऱ्हे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या वरील वक्तव्याचे नितेश राणे यांनी समर्थन करीत मर्सिडिज दिल्या शिवाय किंवा रिचार्ज टाकल्याशिवाय ठाकरे यांचा कॉल ही लागत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.


           भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील भारतमाता युवा प्रतिष्ठान,बाल गोपाल नाट्य मंडळ यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर पत्रकारांशी बोलत होते,यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील,विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री दादा वेदक,अँड.मनोज रायचा,दिपक पाटील, अशोक जैन,जितेंद्र डाकी यांचा सह मान्यवर उपस्थित होते.हिंदुना विश्वास देण्यासाठी यापुढे आपण भिवंडी येथे नियमित येणार आहोत असे सांगत,कर्नाटक एसटी चालक मारहाण प्रकरणी बोलताना आपण हिंदू म्हणून एकत्र आलो पाहिजे.आपण जातीच्या भाषेच्या मुद्द्यावर भांडत रहावे असे मनसुबे जिहादी आक्रमणकर्त्यांचे आहेत.तर नीलम गोऱ्हे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या वरील वक्तव्याचे मंत्री नितेश यांनी समर्थन केले. 
वाढवण बंदर देशाला चालना देणारे वाढवन बंदर हे आपल्या देशाच्या विकासाला आणि देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणारा एक महत्वाचा प्रकल्प आहे,पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकल्पाला मूर्त आकार देत आहेत.या प्रकल्पात महाराष्ट्राचा वाटा 26% टक्के आहे.
बंदरे विकास मंत्रालय माझ्या कडे असल्याने मी जबाबदारीने सांगू शकतो या वाढवण बंदरामुळे आपल्या देशाला जगभरात पहिल्या तीन क्रमांकावर घेऊन जाण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार होणार असून त्यामध्ये वाढवण बंदराचा वाट सिंहाचा असेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी अनगांव येथील गो शाळेला भेट देऊन उपस्थित सेवेकरी कार्यकर्तेचे कौतुक केले.तसेच महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिर मंदिर उभारणाऱ्या शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजुभाऊ चौधरी यांचा सुखकर्ता कृतज्ञता पुरस्कार तर सेवानिवृत्त शिक्षक सुहास बसरकोट सर यांचा अनगाव भूषण पुरस्कार देऊन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *