काँग्रेस पदाधिकारी बैठक संपन्न.
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी लोकसभा लढवण्यावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ठाम असून पक्ष आमच्या भूमिकेचा विचार करून आम्हाला नक्कीच न्याय देईल अशी माहिती रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिली अन्यथा कोकण विभाग रायगड जिल्हा व भिवंडी लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामे देतील असा इशारा घरत यांनी दिला आहे.भिवंडी कोकण विभागीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व अध्यक्ष याची विशेष बैठकी आयोजित करण्यात आली होती.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीस भिवंडी प्रभारी सुभाष कानडे,माजी खासदार सुरेश टावरे,ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,माजी आमदार खलिफा,प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे,तारीक फारुखी,प्रदीप राका,राणी अग्रवाल,विरेन चोरघे,मनीष गणोरे,माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्यासह तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडीत काँग्रेस पक्षाचे संपूर्ण कोकण प्रांतातील पदाधिकारी एकवटले आहेत.आम्ही सुरवाती पासून कोकणात दोन जागां वर आग्रही होतो.

भिवंडी आम्ही सोडणार नाही हा संदेश वरिष्ठांना दिला आहे. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्ष नामशेष करण्याचा घाट घातला आहे.त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले आहेत. भिवंडीचा तिढा प्रदेशातील वरिष्ठांनी सोडवावा.भिवंडी बाबतीत निर्णय न घेतल्यास आम्ही काम करणार नाही आम्ही दुसऱ्यांच्या पालख्या उचलणार नाही असा इशारा महेंद्र घरत,जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिला आहे.दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठांनी शरद पवार यांना समजावयाचे आहे.त्यामुळे काँग्रेसला कार्यकर्ते हवे असतील तर भिवंडीत काँग्रेस पक्षाने पंजा चिन्ह देऊन निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.पक्षातील वरिष्ठांनी आश्वासन दिले असताना भिवंडी काँग्रेस पक्षाने जागा नाही लढली तर याचा परिणाम काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर होऊन सर्वजण राजीनामे देणार असल्याचं इशारा त्यांनी देत दयानंद चोरघे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावर पदाधिकारी ठाम आहेत असा निर्वाळा अखेर महेंद्र घरत यांनी दिला.पक्षातील सर्व पदाधिकारी यांना वरिष्ठांना न्याय द्यायचा आहे,त्यामुळेच नाना पटोले भिवंडीच्या मुद्द्यावर बैठक सोडून निघून गेले,आम्ही आज ही आशावादी असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आम्हाला न्याय देतील अशी भूमिका काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली.संजय राऊत यांनी भिवंडी लोकसभा काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकते यावर प्रतिक्रिया देताना दयानंद चोरघे यांनी संजय राऊत यांचा अभ्यास कमी असल्याचे सांगत जिल्ह्यात अस्तित्वात असलेली 70 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस 2014 मध्ये कपिल पाटील आपल्या सोबत भाजपात गेली तर उर्वरित कार्यकर्ते पैकी 50 टक्के अजित पवार गटात गेले त्यामुळे या मतदार संघात 20 हजार मतदार सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिले नसल्याने राऊत यांना चुकीची माहिती दिली असल्याची पत्रकारांना दयानंद चोरघे यांनी दिली आहे.