भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी महानगर पालिकेचा शहरातील प्रभुआळी मंडई येथे असलेली बीजीपी दवाखान्याची इमारत मोडकळीस व धोकादायक स्थितीत आल्यामुळे सदर दवाखाना पाडून तेथे केंद्र शासनाच्या निधीतून आता अत्याधुनिक अशी इमारत बांधून बीजीपी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रूग्ण नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महा पालिका आयुक्त प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
भिवंडी शहरातील मध्यवर्ती भागात महा पालिकेचा बीजीपी ( बाई गुलबाई पेटीट ) नामक शंभर वर्षे पुरातन जुना दवाखाना होता या दवाखान्यातून लाखो लोकांना औषधोपचार करण्यात आले आहेत.

त्यामुळे या दवाखान्याला एक आगळेवेगळे महत्त्व होते.सदर दवाखाना इमारतीची पडझड झाल्याने महापालिका आयुक्त प्रशासनाने दवाखाना इमारत पाडली आणि सदर दवाखाना तात्पुरत्या स्वरूपी स्व.मिनाताई ठाकरे रंगायतन येथे स्थलांतरीत केला मात्र ठाकरे रंगायतनचे सुध्दा नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे सदर ठिकाणी कार्यरत असलेले बीजीपी दवाखाना बंगालपूरा भागात तात्पुरत्या स्वरूपी स्थलांतरित करणेत आला होता. आता प्रभुआळी मंडई येथे बीजीपी दवाखान्याची अत्याधुनिक नवीन इमारत इमारत उभारण्यात आली असुन आज मंगळवार पासून या ठिकाणी बीजीपी दवाखाना पुन्हा पूर्ववत कार्यान्वित करणेत आला आहे.त्यामुळे शहरातील जास्तीत-जास्त नागरीकांनी सदर दवाखान्यामधील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अनमोल सागर व वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ.संदीप गाडेकर यांनी केले आहे.
चौकट
दवाखाना इमारत उभारणी साठी शासनाकडे पाठपुरावा करीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यामुळे तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला त्यामुळे या नवीन रूग्णालय दवाखाना भूमिपूजन कपिल पाटील व महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले होते आता तीन वर्षानंतर या दवाखान्याची इमारत उभी राहिली आहे.