भिवंडीतील रस्त्यांची झाली चाळण, खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे, शालेय विद्यार्थीसह नागरिकांचे हाल

भिवंडी

नारायण चौधरी यांनी दिला आंदोलनाचा इशारा

 

भिवंडी ( प्रतिनिधी  )सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहर परिसरातील सर्वच मुख्य व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे.

रस्त्यां वरील

खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न  निर्माण झाला आहे त्यामुळे प्रवासी नागरिक,

शालेय विद्यार्थी व वाहन चालक त्रस्त झाले आहेत.वाहन कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची धावपळ उडत आहे महापालिका आयुक्त प्रशासन व राज्य शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा शिवसेना (ठाकरे)चेवतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पक्षाचे नेते माजी नगरसेवक नारायण चौधरी यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

   जुन व जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागात काही महिन्यापुर्वी

डांबरीकरण करून तयार करण्यात आलेले रस्ते व पेवर ब्लॉक उघडले गेले आहेत.त्यामुळें रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्यांची दुर्दशा होत वाहतूक कोंडी चा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.दिवसा व रात्री मोटरसायकल वाहन व अन्य गाडया चालविणाऱ्या वाहन चालकांना पाणी भरलेल्या खड्ड्याचा अंदाज येत

नसल्यामुळे अपघात होत आहेत.वाहतूक पोलीस व

शिवसेना व सामाजिक संस्थाचेवतीने पालिकेला रस्ते दुरूस्ती संदर्भात लेखी पत्र देण्यात आले आहे मात्र थातुरमातुर पणे रस्त्यावर खड्डे भरून तकलादूपणे ठेकेदारां मार्फत काम केले जात आहे त्यामुळे याबाबत आयुक्त अजय वैद्य यांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी माजी नगरसेवक नारायण चौधरी यांनी केली आहे.शहरातील मुख्य धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका रस्ता,कामतघर ताडाळी रोड,

गौरीपाडा जुना ठाणा रोड या रस्त्यांवर खड्डे पडलेले असून रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेने अनेक रस्त्यांवर पेवर ब्लॉकची मलमपट्टी केली होती.मात्र पावसात ही पेवर ब्लॉक उखडून गेले आहेत.खड्डे पडल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना  कसरत करावी लागत आहे.शालेय विद्यार्थीनी रस्ते दुरूस्ती बाबतीत काही दिवसांपूर्वी आंदोलन केले ही भिवंडी साठी शोकांतिका आहे. शिवसेना हा प्रकार सहन करणार नाही असा इशारा चौधरी यांनी दिला आहे.

 

चौकट

महापालिका प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये रस्ते बनविण्यासह रस्ते दुरुस्ती वर खर्च करीत असते.परंतु प्रत्येक वेळी रस्त्यांचा दर्जा खालावलेला असतो त्यामुळे पहिला पाऊस झाला की रस्त्यांची चाळण होते.सध्या रामेश्वर मंदिर,कल्याण नाका, पायल सिनेमारोड,

कामतघर,ताडाळी,

गौरीपाडा – रईस हायस्कूल रोड.

वंजारपट्टी या परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज या मार्गावर

वाहतूक कोंडी होतेच पण या खड्ड्यांमुळे अनेक वाहन नादुरुस्त होऊन तो वेगळा आर्थिक भुर्दंड विशेषतः रिक्षा चालकांना सोसावा लागत आहे.          ठाणेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची तंबी तेथील आयुक्तांनी दिली त्यामुळे ठाण्यातील खड्डे भरण्याच्या कामाचा वेग वाढला आहे.परंतु भिवंडीत खड्डे बुजवण्या संदर्भात चालढकल होत आहे.त्यामुळे  नागरिकांना अशा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने रस्ते चांगल्या पद्धतीने दुरूस्त करून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलन केले जाईल असा इशारा माजी नगरसेवक नारायण चौधरी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *