भिवंडी( प्रतिनिधी) भिवंडी शहरातील विविध भागातील मुख्य वअंतर्गत शाळेच्या आणि वाहतुकीच्या मार्गावर रस्त्यामध्ये असलेले मोठ्या जीवघेणे खड्डे झाले आहेत, खराब रस्त्यामुळे दररोज होणारी वाहतूक कोंडीव नादुरुस्त रस्ते मुळे शहरातील विविध भागातील नागरिक आणि वाहन चालक हैराण आहेत.याबाबत भिवंडी वकील संघटना व सामाजिक कार्यकर्तेनी तक्रारी देऊन सुध्दा महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या खराब व खड्डे मय रस्ते समस्याचा सामना शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत असल्याने त्यांचे शारीरिक आणि शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य शासन व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि महानगर पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात विद्यार्थींसह पालकवर्ग,नागरिकांनी आज गुरुवारी दुपारी मुसळधार पावसात मानवी निषेध साखळी तयार करून लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाचे गलथान कारभाराचा निषेध केला
शहरातील विविध भागात पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण करण्याचे काम सुरु केले आहे.मात्र एमएमआरडीएचे अभियंता आणि ठेकेदार यांनी पावसाळ्याची दाखल न घेता या मार्गावर रस्ते खोदून ठेवले आणि रस्ते न बनविता रस्त्याचे काम अर्धवट ठेवले आहे,तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते खराब झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत.
पावसाच्या पाण्याने केसरबाग-ठाणारोड या मार्गावर मोठमोठे खड्डे झाले आहेत.या मार्गावर रईस हायस्कूल व गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेज असून त्यामध्ये दररोज हजारो विद्यार्थी येत-जात असतात.
शाळेत येताना हि मुले-मुली खड्ड्यात पडून अपघात होत आहे. तर खड्ड्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने विद्यार्थी शाळेत उशिरा येत आहेत. परिणामी त्यांचे शारीरिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील मुव्हमेंट फॉर पीस ऍण्ड जस्टीस या संस्थेद्वारा आज दुपारी निषेध मानवी साखळी निर्माण करीत महापालिका प्रशासनाचे गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने पालिकेच्या गलथान कारभाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.या निषेध मानवी साखळी मध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि,
नागरिक, पालकवर्ग सामील होते.