कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांचे भिवंडीत जल्लोषात स्वागत..

भिवंडी


भिवंडी (प्रतिनिधी) सार्वत्रिक निवडणूका येत असतात जात असतात त्यामुळे निराश न होता लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माजी झालो नाही म्हणजे सगळं मिळवले असे समजायचे असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त करीत त्यांनी सांगितले की माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने समाज उपयोग सेवा घडत राहावी अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो असे मौलिक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भिवंडीत आयोजित झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.


     माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित भव्य दिव्य “केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज क्रिकेट चषक 2025” च्या अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते.यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे,आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद सदस्य देंवेश पाटील,मनपा सभागृह नेते सुमित पाटील,सिध्देश पाटील, माजी सरपंच राजन भोईर,जि.प.
माजी सभापती सपना भोईर कार्यक्रम आयोजक प्रताप पाटील यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले मला आनंद आहे की, या स्पर्धेला माझी दरवर्षी उपस्थिती असते.मात्र यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावण्याची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती.कारण अधिवेशन सुरू होते.आज इथे इतका मोठा कार्यक्रम होतो आहे.बक्षीस म्हणून बाईक्स आहेत
इलेक्ट्रिक कार आहेत.मला असे वाटते की या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा हा पाटील यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने होतोय.जिल्हा व देशातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. कपिल पाटील यांचा स्वभाव आहे की ते कुठलीही गोष्ट लहान होवू देत नाहीत.भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची तर ती भव्यदिव्यच करायची
ही त्यांची खासियतच आहे.कपिलजी सांगत होते की  माजी झालो तरी लोकं मोठ्या संख्येने कार्यक्रम व वाढ
दिवसाच्या दिवशी आले.मात्र आपण कधीच माजी होत नाही.निवडणुका येत असतात जात असतात.लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माजी झालो नाही म्हणजे समजायचे कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *