भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी पोलीस व महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनली आहे. शहरातील वंजारपट्टी नाका,धामणकर नाका, बागे फिरदोस मशिद,तीनबत्ती ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशां सह नागरिकांसाठी दररोजची डोकेदुखी ठरली आहे.विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत वाहन पार्किंग,रस्त्यालगत दुकानदारांनी केलेली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे काढण्या साठी पालिका प्रशासना कधीच गांभीर्य बाळगत नाही तसेच खराब झालेले रस्ते त्यामुळे वाहतूक कोंडी चा प्रश्न अत्यंत गहन बनला आहे.

भिवंडीत वाहतूक पोलिसांचे संख्या बळ कमी असल्यामुळे वाहतूक कोंडी सोडवताना त्यांना अत्यंत तारेवरची कसरत करावी लागत आहे.महापालिका प्रशासनाने फेरी वाले व झोन पार्किंग झोन हे तयार केले नसल्यामुळे सध्या शहरात बिकट अवस्था आहे. खराब खड्डे मय रस्ते मुळे वाहतूक कोंडीच्या समस्या अधिक होत आहे. रस्त्यावर होत असलेले फेरीवाले व हातगाडी चे अतिक्रमणा मुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.तर शहराच्या वर्दळीच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त वाहन तळ उभारण्यात मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरात शासकीय न्यायालयीन कामानिमित्त अथवा वैद्यकीय उपचार घेण्या साठी आलेल्या रुग्णांच्या गाड्यांवर व दुचाकींवर वाहतूक पोलिस कारवाई करून टोइंग व्हॅन मध्ये उचलून घेऊन जात असल्याने चालकांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मनपा मुख्यालय, उपजिल्हा रुग्णालय,बँक, तहसीलदार कार्यालय,प्रांत कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,तालुका पोलीस ठाणे,पोलिस उपायुक्त कार्यालय,भिवंडी न्यायालय,बस आगार,सिनेमा गृह,राजकीय नेते व आमदार खासदार यांची कार्यालये आहेत.त्यामुळे येथे रोजच हजारो नागरिकांसह प्रवाशांची ये जा असते मात्र या ठिकाणी मनपाने कोणतेही वाहन तळ उभारले नसल्याने नागरिकांना आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात.तर काही ठिकाणी उड्डाणपुला खाली वाहन पार्किंग करून तात्पुरती सोय केली जात आहे.काही ठिकाणी उड्डाणपुलांखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आली आहे.त्यामुळे नगरिकांना आपली वाहने उभी करायची कोठे असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. रस्त्यावर उभी मोटरसायकल वाहनावर टोईंग व्हॅन वरील पोलिस कारवाई होत. मात्र चार चाकी वाहनांना अभय मिळत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
वाहन तळाच्या नावाने मनपा प्रशासनाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आरक्षित जागेवर वाहन तळ उभारले आहे.त्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन घाईघाईने नोव्हेंबर 202 मध्ये करण्यात आले आहे.मात्र हे वाहन तळ शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी नसल्याने शो पिस झाल्याची चर्चा आहे.सदर वाहन तळ आजपर्यंत बंदच आहे.त्यामुळे भिवंडीत वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. पालिकेकडून कोणत्याही वाहनतळाची निर्मिती आजपर्यंत करण्यात आलेले नाही त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरात वाहन घेऊन आलेल्या नागरिकांसमोर आपली वाहन उभी करायची कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे.