भिवंडीतील भोसले हत्या प्रकरण,
न्याय मागणी साठी प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चा

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी ) धक्का लागल्याच्या शुल्लक वादातुन एका 16 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.झालेल्या या घटनेचा निषेध करणे व संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणी साठी आज रिपब्लिकन सेक्युलर पक्षाचे नेते अँड.किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणी एल्गार मोर्चाचे आयोजन प्रांत कार्यालयावरकरण्यात आले होते.  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आरपीआय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम दादा गायकवाड, साकी गायकवाड,प्रदीप थोरात,कॉम्रेड उदय चौधरी,रवींद्र चौधरी,राहुल सोळंखी,सुमित्र कांबळे,शाहूराज साठे अदि मान्यवरसहभागी झाले होते.

यावेळी प्रांताधिकारीकार्यालयात उपविभागीय अधिकारी अमित सानप हे उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आणि त्यांना निवेदन सादर न करता आपल्या मागण्यांचे निवेदन भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्याकडे दिले. मयत संकेत भोसले यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,फरार सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा मागण्या चे निवेदन देण्यात आले.

1 thought on “भिवंडीतील भोसले हत्या प्रकरण,
न्याय मागणी साठी प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चा

  1. भिवंडी शहरातील बातम्या आपल्या द्वारे जनतेला मिलतात ही आनंदाची गोष्ट आहे खरोखर आपण जनतेला जागृत करण्यासाठी मेहनत घेतली आहे धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *