भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीतील व्यवसाय आर्थिक गर्तेत सापडला असतानाच एका कापडा उत्पादक यंत्रमाग व्यवसायिकाची मध्यास्थाने 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.पोलिसांनी सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गैबीनगर खान कंपाऊंड येथील व्यवसायिक आमिर आसिफ खान यांनी उत्पादन केलेला कपडा अशोकनगर कल्याण रोड येथील मदन सिंह यांना विश्वासाने विक्री करीत होते.आरोपी मदन सिंह याने फिर्यादी व इतरांचा विश्वास संपादन करून त्यांचेकडून प्रत्येक वेळी कच्चा कपड्याचा माल घेत असे. असा एकत्रित 58 लाख 55 हजार 967 रुपये किमतीचा कच्चा कपडा घेऊन त्याचे पैसे न देताच तो पळून गेला आहे.या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आमिर आसिफ खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.पुढील तपास सपोनि संतोष तपासे करीत आहेत.
