बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भिवंडी



 ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा देश तरुणांचा देश आहे. या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम हे शासन करीत आहे. यापुढेही करीत राहील, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे उद्गगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहे.ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका येथे कौशल्य विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.


प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार किसन कथोरे,माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के,अपर मुख्य सचिव, ओम प्रकाश गुप्ता,आयुक्त श्रीमती निधी चौधरी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मीरा भाईंदर मनपा आयुक्त संजय काटकर, भिवंडी मनपा आयुक्त अजय वैद्य, आदि मान्यवर उपस्थित होते.  या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो. या मेळाव्यात  हजारो तरुणांनी सहभाग घेतला. सरकारच्यावतीने 6 हजार तरुणांना रोजगार दिला जातोय.राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत 700 दवाखाने सुरू केले असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.शासन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे.राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत. ठाणे येथून लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.शासकीय नोकर भरती बंदी उठवली असून आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या दिल्या असून 1 लाख स्वयंरोजगार  उभे केले आहेत. यासाठी 11 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृध्दी महामार्ग, अटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प निर्माण होत असल्याचे आपल्या दिसत आहेत. यामुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार आहे. हे सरकार लोकांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विविध मान्यवरांची भाषण झाली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 हजार 800 महिलांना शिलाई मशिन आणि घरघंटीचे वाटप, रहिवाशी दाखले, हिट ॲक्शन प्लॅनचे उद्घाटन, उष्ण्ता उपाययोजना कृती आरखडा, महाराष्ट्र स्कोर कार्डचे प्रकाशन असे विविध उपक्रम संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *