जिल्हा स्तरीय बैठक संपन्न.
भिवंडी (शरद भसाळे) ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे मात्र पोलीस बळ अपुरी आहे असे असताना सुद्धा पोलीस दिवस – रात्र काम करून कायदा सुव्यवस्था राखण्याचे यशस्वी भूमिका पार पाडत आहेत.आगामी काळामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका व धार्मिक सण पाहता पोलीस संख्या बळ वाढवून लोकांना सहकार्य केले जाईल. पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना कायदा पालन व शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांनी सुद्धा पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे
तसेच सण साजरा करत असताना इतर धर्मियांचे भावना दुखावत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असे परखड मत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केले आहे.

ठाणे पोलीस आयुक्त सिद्धी सभागृहात पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त सुधाकर पठारे यांच्यासह व पोलीस उपाआयुक्त अधिकारी वर्ग व्यासपीठावर उपस्थित होते.पोलीस ठाण्यात पोलीस बळ वाढवून पोलीस चौक्या निर्माण करून कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्याची भूमिका पोलीस पार पाडत आहेत.महिला व जेष्ठ नागरिकांना संरक्षण भूमिका सहकार्य केले जात आहे.

रमझान महिना,होळी, धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहून पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे असे आवाहन पोलीस आयुक्त डुंबरे यांनी केले.धार्मिक कार्यक्रम सण साजरा करताना सतर्क असणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचा इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे मत ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले.सध्या रमजान महिना व होळी,धुलीवंदन, रंगपंचमी सारखे धार्मिक सण असल्यामुळे पोलिसांनी शहरात पेट्रोलिंग व गस्त सुरू केली आहे त्यामुळे सर्व नागरिकां सचेत राहून पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे.तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे असे परखड मत डॉ.चव्हाण यांनी व्यक्त केले.यावेळी भिवंडी,ठाणे,कल्याण,अंबरना,बदलापूर,डोंबिवली आदि शहरातील शांतता समितीच्या सदस्यांनी आपली मत व्यक्त करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.