भिवंडीत पोलीस शांतता समीती सदस्यांची बैठक संपन्न.
भिवंडी ( भानुदास भसाळे ) येणारा काळ हा सण उत्सवाचा आहे.त्यामुळे आपल्या संस्कृतीचे पालन करून सर्वांनी धार्मिक सण – उत्सव साजरे करावेत सण हे आनंद व स्फूर्ती देणारे असतात त्यामुळे त्याचा आनंद लुटावा इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे असे मत भिवंडी पोलीस उपाआयुक्त श्रीकांत परोपकारी यांन यांनी आयोजित केलेल्या शांतता समिती बैठकीत व्यक्त केले.येत्या 24 व 25 रोजी होळी व धुलीवंदन त्याच बरोबर येत्या 27 व 28 मार्च रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव संपन्न होणार आहे.सण व उत्सव शांततेमध्ये व आनंद वातावरणात संपन्न होण्यासाठी भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उपाआयुक्त श्रीकांत परोपकारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती सदस्य,उत्सव समितीचे सदस्य व नागरिकांची विशेष बैठक पोलीस संकुल सभागृहात आयोजित केली होती.यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,शिवजयंती उत्सव समितीचे सचिव मदन भोई,सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

जगामध्ये भारता देश असा आहे कि येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव व सण संपन्न होत असतात.या उत्सवाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, मात्र उत्सव संपन्न करताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.एकमेकाचा आदर करून उत्सवाचा आनंद घ्या त्याचा बेरंग करू नका उत्सवाच्या दरम्यान कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपाआयुक्त परोपकारी यांनी यावेळी दिला.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श पुरुष होते त्यांनी दिलेल्या शिकवणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा चांगले शिक्षण घ्या आणि आपल्या जिवनात प्रगती करा असे आवाहन त्यांनी केले.लोकसभा निवडणूक अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.त्यामुळे त्याचे पालन करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी यावेळी केले.शहरातील खराब रस्ते, अस्वच्छता आणि सुरळीत वीज पुरवठा करणे, बेकायदेशीर बँनरबाजी अशा विविध समस्या बाबत उपस्थित सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करून महापालिका व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली.बैठकीचे सुंत्रसंचालन पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी केले.