भिवंडी (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत असून केंद्रीयमंत्री व भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदार संघात ५१ टक्के मते मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला.
भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील उबाठा गटातील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र दिपचंद्र घरत, कोमल राकेश पाटील, भाग्यश्री भारत पाटील, माजी उपसरपंच भालचंद्र शांताराम घरत, संगीता दिपचंद्र घरत, भारत गुरुनाथ पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत करून आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा निर्धार केला. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती.

मनसेच्या भिवंडी तालुक्यातील खारबाव गाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. खारबावच्या उपसरपंच जयमाला पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दर्पण पाटील, घनश्याम कारभारी, अजय जाधव, मिलिंद खंडागळे यांच्यासह शेकडी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशासाठी तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे यांच्यासह भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाटील, विजय मुकादम, देवा पाटील, प्रफुल्ल तांगडे यांनी पुढाकार घेतला. या वेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.