भिवंडीत राष्ट्रवादीवर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराज.
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे या मतदारसंघातून नऊ वेळा काँग्रेस पक्षाचा खासदार झाला आहे.त्यामुळे या मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा हक्क असून पक्षाला प्रस्ताव देऊन त्यांच्या निर्देशानुसार भिवंडी लोकसभा मतदार संघातून मैत्रीपूर्ण निवडणूक लढवली जाईल अशी माहिती काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली.तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेनी राष्ट्रवादी चा प्रचारात सहभागी होऊ नये असे आवाहन चोरघे यांनी केले आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त करीत आहे त्यामुळे शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,शहराध्यक्ष रशिद ताहीर मोमीन, माजी खासदार सुरेश टावरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तारीक फारुकी,जव्वाद चिखलेकर,अनस अंसारी यांच्या सह भिवंडी कल्याण, शहापूर, मुरबाड येथील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातील इतर जागांसह भिवंडी लोकसभा मतदार
संघातून मैत्रीपूर्ण लढत असल्यास वरिष्ठांच्या आदेशा नुसार मैत्रीपूर्ण लढत देणार अथवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर या लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी लढणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे.

मुंबई,भिवंडी सह कोकण प्रांतातून काँग्रेस पक्षास उमेदवारी मिळाली नाही तर परंपरागत असलेल्या कोकण प्रांत व भिवंडी लोकसभेतून काँग्रेसची पंजा ही निशाणी मतपेटीतून व
कोकणातून हद्दपार होणार आहे.त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी या बाबीचा विचार करून राज्यात सांगलीच्या जागे बद्दल जसा मैत्री पूर्ण लढत देण्याचा विचार होत आहे.त्याच प्रमाणे भिवंडी लोकसभा मतदार संघातून देखील आपली मैत्रीपूर्ण लढत देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले तर मैत्रीपूर्ण अन्यथा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी लढू अशी प्रतिक्रिया चोरघे यांनी दिली आहे.