उमेदवारला यंदा खर्चाची मर्यादा 95 लाख..
भिवंडी (शरद भसाळे ) भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23, भिवंडी लोकसभा निवणुकीची प्रक्रिया दि.26 एप्रिल पासून सुरवात होणार आहे. मतदान प्रक्रीयेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशन पत्र स्विकारणे हा आहे. जे इच्छुक उमेदवार अर्ज भरणार आहेत 26 एप्रिल सुरू होणार असून ते 3 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.तसेच प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लाख असल्याचे त्यांनी सांगितले.
भिवंडी लोकसभा निवणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व अधिकार व कर्मचारी सुसज्जपणे काम करीत आहेत.23 भिवंडी लोकसभा निवणुकीची प्रक्रिया दि.26 एप्रिल पासून सुरवात होणार आहे.मतदान प्रक्रीयेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशन पत्र स्विकारणे हा आहे.जे इच्छुक उमेदवार अर्ज भरणार आहेत 26 एप्रिल सुरू होणार असून ते 3 मे पर्यंत सुरू राहणार आहे.
नामनिर्देशन पत्र छाननी 4 मे 20 24 रोजी होणार आहे. उमेदवार यांना नामनिर्देशन भरताना काही अडचण असल्यास त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,संबधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून शंका दूर करून घ्याव्यात असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी केले आहे.उमेदवारांने नामनिर्देशन पत्र भरताना अचुक भरा, तसेच नामनिर्देशन भरताना सोबत जोडावयाचे प्रतिज्ञापत्रे भरताना सर्व तपशील व्यवस्थित पुर्ण भरा. उमेदवारांने व त्याचे प्रतिनिधी यांचे अलिकडील काळातील काढलेले सहा फोटो नामनिर्देशन अर्जा सोबत घेवून येणे अपेक्षीत आहे. मतदान प्रक्रीयेतील सर्वात महत्याचा टप्पा म्हणजे नामनिर्देशन पत्र स्विकारणे याकामी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची रंगीत तालीम घेण्यात आली. कमीत कमी वेळात नामनिर्देशन पत्र तपासून नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येतील निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील महत्वाच्या अशा सर्व गोष्टींची पुर्तता झाली असून निवडणूक प्रशासन सज्ज आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.निवडणुकीकरीता उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडावे व त्या खात्यातून सर्व निवडणूक खर्च करावा. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लाख आहे. या खर्चाची स्वतंत्र तपासणी केंद्रीय खर्च निरीक्षक करतील.उमेदवार यांच्या बरोबर केवळ तीन वाहनांना 100 मीटरच्या आत मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. नामनिर्देशन भरताना केवळ उमेदवारासह पाच प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहू शकतात.नियंत्रण कक्ष सुरू निवडणूक कालावधीमध्ये विविध तक्रारी संदर्भात मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक 18002331114 हा सुरू करण्यात आला असून तो 24 तास सुरू राहणार आहे. तसेच सहाही विधानसभा निहाय 134 भिवंडी ग्रामिण 02522-221215, 135 शहापूर 0252-72955005, भिवंडी (प) 02522-299606, भिवंडी (पूर्व ) 299160, कत्याण (प) 0251-2990127, 139 मुरबाड 0524-222199 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक विभागा कडून करण्यात आले आहे.निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणे कामी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमानुसार कारवाई करणार असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला. उमेदवाराचा प्रचार सभा,रँली याचे सर्वांचे व्हीडीओ शुटींग करण्यात येणार आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या निकषावर सर्व परवानग्या देण्यात येतील. कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे प्रचाराचे साहित्य प्रसिध्द करण्यात येऊ नये,तसेच कोणतीही परवानगी नसताना कोणतेही वाहन वापरता येणार नाही किंवा तसेच कोणताही प्रचार करता येणार जर नियमांचे व कायद्यांचे उल्लघंन झाल्यास त्या उमेदवार व पक्षावर नियमा
नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.
