भिवंडीत प्लास्टिक पंखे बनवणाऱ्याbl कंपनीस भीषण आग..

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका प्लास्टिक पंखे बनविणाऱ्या कंपनीत आज रविवारी सायंकाळी अचानक भिषण लाग लागण्याची खळबळजनक घटना घडली आहे.
आगीने रौद्र रूप धारण केल्याने या आगीत कंपनीतील लाखो रुपये किमंतीची मालमत्ता जळून खाक झाली आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांची घटनास्थळी धाव घेऊन अथक परिश्रम घेत ही आग तीन तासात आटोक्यात आणून शांत केली आहे. पोलिसांनी या आगी संदर्भात नोंद घेतली आहे.


     मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी जवळील
सोनाळे गांव परिसरातील राजलक्ष्मी हायटेक या इंडस्ट्रियल पार्क मधील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर Hicool ही प्लास्टिक पंखे बनवणारी कंपनी आहे. त्याठिकाणी आज सायंकाळी अचानक आग लागली.पाहता पाहता आग भडकत गेल्याने रौद्र रूप धारण करून या संपूर्ण आगीत कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेची माहिती मिळाल्यावर भिवंडी व कल्याण डोंबिवली महानगर महापालिकेच्या जवानांनी अग्निशामक दलाच्या गाड्यासह घटनास्थळी धाव घेऊन  त्यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवत आग शांत केली.आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नसली तरी या आगीत सुदैवाने  कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *