भिवंडीच्या मध्यवर्ती भागातील डम्पिंग ग्राउंड मधील आगी मुळे नागरिकांचे आरोग्यास धोका,पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहरातील शिवाजी नगर खडक रोड या नागरी वस्ती असलेल्या मध्यवर्ती भागात महानगर
पालिकेने डम्पिंग ग्राउंड बनविले आहे. या डंपिंग ग्राऊंडवर ठेकेदारा मार्फत दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो.या कचऱ्यावर पालिका प्रशासनाकडून प्रभावीपणे जंतुनाशक औषध फवारणी होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. नियमित साठलेला कचरा ठेकेदार वाहून न नेता तेथे साठवून ठेवल्याने
आग लावण्याचे प्रकार नियमित घडत आहेत त्यामुळे धुराचे सावट निर्माण होऊन नागरिकांना सह शालेय विद्यार्थी व महिलांना खोकल्याचा भयंकर त्रास होत आहे.महापालिका आयुक्त व आरोग्य निरीक्षक व विभाग प्रमुख यांच्या कडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी करून सुध्दा सराईतपणे दुर्लक्ष केले जात आहे.नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांना कडून व्यक्त केली जात आहे.


  भिवंडी महानगर पालिकेत सध्या प्रशासक तथा आयुक्त म्हणून अजय वैद्य हे काम पाहत आहे. शहरातील कचरा उचलण्याचे काम नियमित होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी 1 ते 5 प्रत्येक प्रभाग समितीनुसार कचरा उचलण्यासाठी पाच खाजगी ठेकेदार आयुक्तांनी नेमले आहेत.सदर ठेकेदार यांनी शहरातील कचरा उचलून तो चावींद्रा डम्पिंग ग्राउंड येथे टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र तसे न होता काही ठेकेदार परिसरात जमा झालेला कचरा शहरातील मध्यवर्ती नागरी वस्ती असलेल्या शिवाजीनगर येथे टाकत आहे.
त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे थर झाले आहे.जंतुनाशक औषध फवारणी होत नसल्याने दुर्गंधी आणि मच्छरांचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.या कचऱ्याचे ढिगाऱ्याला नेहमी आग लावली जात असल्याने परिसरात प्रदूषण पसरत आहे. हा कचरा नियमित उचलला जातो किंवा नाही हे पालिकेच्या प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य विभागप्रमुखांनी पाहणे आवश्यक असताना ते या भागात फिरकत देखील नाही.
ठेकेदारामार्फत शिवाजीनगर येथील मनपाच्या जागेवर टाकलेला कचरा गेल्या सहा महिन्यापासून पूर्णपणे उचलेला नाही.त्यामुळे साचलेल्या कचऱ्यास वारंवार आग लावली जात आहे. 
शिवाजीनगर भागात रस्त्यावर भाजीविक्रीचे मार्केट दररोज भरते.यावेळी बाजारात खरेदी साठी आलेल्या महिलांना कचरा दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आयुक्त अजय वैद्य यांनी याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.


प्रतिक्रीया.

भिवंडीतील शिवाजीनगर येथे डम्पिंग ग्राउंड ची पाहणी केली आहे. तेथे जंतुनाशक औषध फवारणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.तसेच कचऱ्याला आग लावणे ही गंभीर बाब आहे.असे करू नये.स्वच्छता बाबतीत आरोग्य निरीक्षकांना सुचना दिल्या आहेत. कामात हलगर्जीपणा आढळल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल.

 अजय वैद्य, आयुक्त. भिवंडी मनपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *