एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज – शरद पवार..

भिवंडी

महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी

भिवंडी ( प्रतिनिधी ) देशाची घटना बदलण्यासाठी 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्तकेले आहे. 
      राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा
मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या प्रचारासाठी भिवंडीतील पोगावं येथे परिवर्तन प्रचार सभा आज शुक्रवार सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर शरद पवार यांच्या सह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे खासदार संजय सिंह,खा.सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,अनिल देशमुख,राजेश टोपे,भिवंडी आमदार रईस शेख,शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार रूपेश म्हात्रे,काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर, उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या सह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.


या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी असताना भाजपा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्या साठी प्रयत्न करत आहेत असे मत पवार यांनी व्यक्त करून भिवंडीची विकासासाठी सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मोदी यांनी खोट्या केसेस मध्ये अडकवून मला कारागृहात टाकले,
मात्र सुप्रीम कोर्टाने मला जामीन मंजूर केला त्यामुळे मी न्यायालयाचा आभारी आहे. आता दिवसरात्र मेहनत करून 21 दिवसात भाजपाला पराभूत करूनच कारागृहात परत जाईल असा निर्धार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त करीत देशाला वाचविण्यासाठी मतदानाची भिक मागण्यासाठी मी भिवंडीत आलो आहे असे मत दिल्लीचे केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केले.दिल्ली येथील  गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण,
मोफत वीज,मोफत रुग्णालय उपचार मोफत औषध देण्याचे काम आम्ही करतो त्यामुळे मोदी सरकार नाराज झाले असुन माझ्या विरोधात आकसाने कारवाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले. रशियाच्या नेता पुतीन याने विरोधकांना मारले कारागृहात टाकले,
बांगलादेश व पाकिस्तान मध्ये सुध्दा असेच करुंन सत्ता हस्तगत केली ,भारत कडून जग शिकते पण मोदी बांगलादेश पाकिस्तान यांच्या कडून शिकून तसेच काम भारतात करू इच्छितात असा आरोप केजरीवाल यांनी केला.नरेंद्र मोदी हे भयग्रस्त असून पक्षात 75 वर्षांवरील नेत्यांना राजकारणातून निवृत्ती देणार पुढील वर्षी मोदी सुध्दा 75 वर्षांचे होणार असल्याने ते मत मागत आहेत ते अमित शहा यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी हे नागरिकांनी लक्षात घ्यावे आणि महाविकास आघाडीचे बाळ्या मामा प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन शेवटी केजरीवाल यांनी केले.
भिवंडी शहराला रस्ते वीज,पाणी आणि मामा या गोष्टी महत्त्वाच्या असून बाळ्यामामा यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड व उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *