भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील गटार व मोठ्या नाल्यातून शेकडो अनाधिकृतपणे नळ कनेक्शन पाईपलाईन व्दारे कार्यरत आहेत.याबाबत पालिका प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र राजकीय आश्रय असल्याने या अनाधिकृत नळ कनेक्शन पाईप लाईनवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.असे असतानाच शहरातील नारपोली परिसरातील गटार व मोठ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत नळ कनेक्शन पाईपलाईन असल्याचे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. ही गंभीर बाब महापालिका आयुक्तांचे निदर्शनास पालिका अधिकाऱ्यांनी आणून देताच अनधिकृत नळ कनेक्शन तोडून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.मात्र गेल्या काही वर्षा पासुन पाणी चोरी करणाऱ्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई झालेली नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भिवंडी शहर परिसरात महापालिके प्रशासनाने ठेकेदारा
मार्फत गटार व नाले सफाईची काम सुरू केली आहेत.ही काम सुरू असताना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना नाल्यांमध्ये अनाधिकृतपणे पाण्याच्या नळ कनेक्शन पाईपलाईन असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे त्यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे त्यामुळे आयुक्तांनी अनधिकृत नळ कनेक्शन तोडू कारवाई करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत सदरच्या कापड डाईंग व सायझिंगयामध्ये जाणारे मोठ्या व्यासाचे नळ कनेक्शन,तसेच वाणिज्य वापराचे नळ कनेक्शन ज्यामध्ये हॉटेल, मोती कारखाने यामध्ये जी अनाधिकृत नळ जोडणी करण्यात आली आहे त्यावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी विशेष पथकास दिले आहेत.

त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शेखर चौधरी यांच्या उपस्थितीत पर्यवेक्षकीय अधिकारी सायराबानो अंसारी, कनिष्ठ अभियंता सर्फराज अंसारी, विराज भोईर,नफिस मोमीन यांच्या पथकाने नारपोली येथील मेन रोडच्या खालून ज्या नाल्यांमधून जी 2 इंच 3 इंच व्यासाच्या अनधिकृत नळ कनेक्शन पाहणी करून 30 ते 35 मोठ्या आकाराचे अनाधिकृत नळ कनेक्शन खंडित केले आहेत.मात्र पाणी चोरी बाबत अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.
गटार व नाल्या मधील ही अनधिकृत नळ कनेक्शन कोणाची आहे याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही आयुक्तांच्या आदेशानुसार अनाधिकृत नळ कनेक्शन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती शेखर चौधरी यांनी दिली.