भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांचा दणकट विजय

भिवंडी

भिवंडी (बी.एस. ) भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीचे रिंगणात असलेले केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री तथा  भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा दणदणीत पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी सुमारे 4 लाख 98 हजार 199 मत घेतली. त्यांनी 66 हजार 292 पाटील पराभव केला आहे. तर कपिल पाटील यांना  4 लाख 31 हजार 907 मत मिळाली त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जोरदार धक्का बसला आहे.या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेले निलेश सांबरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहे.


त्यामुळे कुणबी समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
   भिवंडी लोकसभा मतदार संघ हा महाराष्ट्रामध्ये चर्चित मतदारसंघ म्हणून गणला गेला होता केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाकडे असलेली ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेऊन  येथे महाविकास आघाडीचेवतीने सुरेश (बाळामामा) म्हात्रे यांना निवडणुकीचे रिंगणात उतरवून भाजप पक्षाला मोठे आव्हान दिले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी कुणबी समाजाचा व आपल्या शैक्षणिक कामाचा प्रकोंडा करीत निवडणूकीचे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक तिरंगी होणार असल्याची चिन्ह दिसत होती कपिल पाटील यांना विजयी करण्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती.त्यामुळे शरद पवार यांनी सुद्धा दोन प्रचार सभा घेऊन जोरदार प्रचार यंत्रणा राबविली त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची व चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसु लागली होती.


भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे 12 लाख 50 हजार 76 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे या मतदार
संघात तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे दिसत होती. आज सकाळी 8 वा.भिवंडी तालुक्यातील सावद गांव परिसरातील शासकीय गोदाम संकुलामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती पहिल्या फेरीत कपिल पाटील यांनी 4 हजार मतांची आघाडी घेतली होती.मात्र त्यानंतर शेवटच्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे सुरेश (बाळा मामा) म्हात्रे यांनी आपली आघाडी कायम ठेवली मतमोजणी अंती त्यांनी  सुमारे 4 लाख 98 हजार 199 मत मिळवत कपिल पाटील यांचा 66 हजार 292 मतांनी दणदणीत पराभव केला.कपिल पाटील यांना 4 लाख 31 हजार 907 मत मिळाली. तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना 2 लाख 30 हजार 254 मत मिळाली सुरेश म्हात्रे हे विजय घोषित होताच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार विजयाच्या घोषणाबाजी गुलाल उधळत जल्लोष केला. भिवंडी शहरातील विविध सायंकाळी भागात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या स्वागत करण्यात आले.सुमारे 29 मतमोजणी चे फेऱ्या करण्यात आले.निवडणूक मतदान मतमोजणी केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.स्वामी यांनी आपल्या विशेष पथकाचे सहाय्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *