पिसाळलेल्या कुत्र्याचा भिवंडीत हैदोस, महिन्याभरात 886 जणांना घेतला चावा,

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यामुळे शालेय विद्यार्थी सह जेष्ठ नागरिक व मोटरसायकली स्वारांचे प्राण धोक्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत 100 अधिक लोकांना भटक्या कुत्र्यानी दंश (चावा) केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.शांतीनगर, ब्राह्मण आळी,

बाजारपेठ, कामतघर, दरगाह रोड, धामणकर नाका,

पद्मानगर अशा विविध भागात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यानी उच्छाद मांडला आहे.

महापालिका प्रशासनाकडे भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना नसल्याने नागरिकां मध्ये संताप व्यक्त केला जात असुन राज्य शासनाने महापालिका आयुक्त प्रशासनाकडे याबाबत सविस्तर चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असूआहे.

भिवंडी महापालिकेचे कुत्रे नसबंदी करणारे श्वान निरबीर्जीकरण केंद्र काही वर्षां पासून बंद आहे.शहरात भटक्या कुत्र्यांची व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढीस लागलेली आहे.भटक्या कुत्र्यांचा त्रास बहुतांश रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होत आहे.रात्रभर कुत्रे रस्त्यावर भूंंकत असल्याने जेष्ठ नागरिकांची झोपमोड होत आहे. तसेच रस्त्यावरून दुचाकी वरून जाणाऱ्या

चालकांचे मागे कुत्रे धावत जाऊन चावा घेण्यासाठी सरावत असल्याने अपघात होत आहेत.काही ठिकाणी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी अनेकांना दंश करण्याच्या घटना घडत आहेत.शहरात 7 व 8 जुलै या दोन दिवसात 125 अधिक जणांना श्वान दंश झाल्याची घटना समोर आली असून,संपूर्ण जून महिन्या मधील तीस दिवसात 886 जणांना श्वान दंश झाल्याची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ.माधवी पंधारे यांनी दिली आहे.7 जुलै रोजी कामतघर परिसरात 60 श्वान दंश झाले होते तर शांतीनगर भागात आठ जुलै रोजी 45 जणांना श्वान दंश झाले या व्यतिरिक्त इतर भागात सुध्दा श्वान दंशाच्या घटना घडल्या असून या दोन दिवसात एकूण 135 रुग्णांना रेबीज प्रतिबंधक पहिला डोस देण्यात आला आहे.रुग्णालयात रेबीज डोस चा साठा उपलब्ध आहे अशी माहिती अधिक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे.

चौकट

भिवंडी महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा निर्बीजीकरण  बंद आहे.पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण  करण्यासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविली परंतु संस्थांकडून प्रतिसाद आला नाही.येत्या आठ दिवसांमध्ये भिवंडीतील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी

यंत्रणा उभी केली जाईल अशी माहिती आयुक्त प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *