भिवंडीतील रहिवासी नागरिकांना दिलासा.
भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वऱ्हाळा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागला आहे.त्यामुळे समाधान व्यक्त केले जात असले तरी लाखो लिटर पाणी नाले गटारात वाहून जात असल्याने सर्व सामान्य स्थानिक नागरिक व माजी नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.भिवंडी महापालिका आयुक्त प्रशासनाने तलावाची खोली वाढवून उंच भिंत उभारून पाण्याची साठवणूक केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल यासाठी आयुक्तांनी तात्काळ पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.तलाव ओव्हरफ्लो तुडुंब भरून वाहू लागल्याने जुन्या भिवंडीतील रहिवासी नागरिकांना भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न आता काही प्रमाणात मार्गी लागला आहे
भिवंडी शहरातील कामतघर परिसरातनै सर्गिक सौंदर्याचे वरदहस्त लाभलेला वऱ्हाळा देवी मंदिर शेजारी हा तलाव असून तो पाण्याने तुडुंब भरून शुक्रवार सकाळ पासून धो धो वाहू लागला आहे.गेल्या चार दिवसां पासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून नुकसान झाले आहे.असे असले तरी वऱ्हाळा तलाव तुडुंब भरल्याने आता लाखो रहिवाशांना भेडसावणारा पाणी कपातीचा प्रश्न सुटनार आहे.वऱ्हाळा
तलावातून जूनी भिवंडी शहराला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज2 एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे.वऱ्हाळा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागला असला तरी लाखो लिटर पाणी नाले – गटारात वाहून जात असल्याने स्थानिक नागरिक सतिश चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर महापालिका आयुक्त प्रशासनाने तलावाचे वेष्टेज जाणारे पाणी साठवण्यासाठी तलावाची खोली वाढवावी तसेच उंच भिंत बांधून निरर्थक वेस्टेज पाणी गटार नाला मध्ये जाणारे अडवून ठेवावे अशी मागणी पालिकेचे माजी गटनेते निलेश चौधरी व माजी नगरसेवक साईनाथ पवार यांनी केली आहे.जून शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे वऱ्हाळा तलावा सह कामवारी नदी सह अन्य ठिकाणी ग्रामीण भागातअसलेल्या विहिरी सुध्दा तुडुंब भरून वाहू लागले आहे.समाधानकारक पाऊस होत असल्याने ग्रामीण भागात शेतीची कामे सुध्दा जोमाने सुरू झाली असुन शेतकरी कुटुंब आनंदीत झाले आहे.
भिवंडीतील या वराळा तलावातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो मात्र या तलावामध्ये परिसरातील काही गटार व नाल्याचे पाणी सुद्धा मिसळत आहे.त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीने गटार व नाल्यांचे तलावात येणारे पाणी थांबवून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी भिवंडी महापालिकेचे माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी केली आहे.