भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील नागाव येथे एका हॉटेल मालकाने वेटर यांच्या मदतीने महिला व तिच्या मदतीसाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना नुकतीच भिवंडीत घडली असून.या विरोधात शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

झालेल्या या गंभीर घटनेचा विरोधात आज बुधवार दुपारी सकल हिंदू समाज, विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्तेनी भिवंडी ठाणे महामार्गावरील स्व.आनंद दिघे चौकात जोरदार निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली आणि भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश निषेध मोर्चा काढून दोषी आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या निषेध मोर्चात भाजपा आमदार महेश चौगुले,भाजपा शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी अध्यक्ष संतोष शेट्टी,मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवी,विश्व हिंदू परिषदेचे देवराज राका,अँड.मनोज रायचा,राजेश कुंटे,बजरंग दलाचे दादा गोसावी,सुजित गुप्ता,पू.चिदानंदजी सरस्वती महाराज, महंत शिवरूपानंद महाराज,विहीप चे प्रदेश मंत्री मोहन सालेकर,भाजपा महिला शहराध्यक्षा सुनीता टावरे यांचेसह मान्यवर साधू महंत,बजरंग दल,विश्व हिंदू परिषद,
भाजपा,मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भिवंडी शहरातील स्व.आनंद दिघे चौक येथून सुरू झालेला हा आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत जोरदार घोषणाबाजी निदर्शने करीत दाखल झाला.पाकिस्तान व बांगला देश मुर्दाबाद,अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.उरण येथील यशश्री शिंदे व धारावी येथील अरविंद वैश्य यांच्या हत्यांसह भिवंडीतील हॉटेल मालकाने केलेल्या मारहाणीत विकास यादव गंभीर जखमी झाला आहे. हा जिहादी हल्ला असून त्याचा निषेध यावेळी सर्वांनी करीत आरोपीं विरोधात कठोर शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या आंदोलन मुळे भिवंडी ठाणे महामार्गावरील धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था दोन तास विस्कळीत होऊन ठप्प झाली होती.आंदोलनकर्ते बजरंग दलाचे कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर रस्त्या वर ठिय्या देऊन बसल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा परिणाम शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक पोलिसांची वाहन कोंडी सोडवण्यासाठी दमछाक झाली होती. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.