भिवंडी ( शरद भसाळे ) लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात जात आहे, शासकीय योजना बंद करण्यासाठी खटाटोप करीत आहेत. शासकीय योजनांना खोडा करणाऱ्या विरोधकांना मतदार व लाडक्या बहिणींनी या निवडणुकीत जोडा दाखवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी भिवंडीत झालेल्या प्रचार सभेत केली आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी,भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार महेश चौगुले आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातून उमेदवार शांताराम मोरे हे विधानसभेच्या निवडणुकीचे रिंगणात महायुतीच्यावतीने उतरले आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार करण्यासाठी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भिवंडी शहरातील कामतघर येथील काटेकर मैदानात आले होते.

यावेळी झालेल्या प्रचार सभाप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील,
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे, भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण पाटील भाजपाचे प्रदेश सदस्य भरत पाटील, भिवंडी शहराध्यक्ष हर्षल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व महायुती मित्र पक्षाचे अध्यक्ष व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. लाडक्या बहिणींचा संसार सुखाचा व आनंदी राहावा यासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.यामुळे आता दर महिन्याला भाऊबीज होणार आहे,लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये नियमित पैसे येणार आहेत ही योजना सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे.
महायुती शासन सर्वसामान्य न्याय देण्यासाठी काम करत आहे त्यामुळे लोकपयोग योजना बंद करण्यासाठी अनेक लोक कोर्टामध्ये जाऊन खोडा घालण्याचा खटापट करीत आहे अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे.मतदार व लाडक्या बहिणींनी आता जागृत होऊन विरोधकांना जोडा दाखविण्याची वेळ आलेली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवारांना भरघोसपणे मतदान करून महायुतीचे सरकार पुन्हा आणावे असे आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले विरोधक ही योजना बंद करून आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करीत आहे,आम्ही बहिणींच्या सुखासाठी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत असेही शिंदे म्हणाले आगामी काळात दीड हजाराच्या रकमेत वाढ करून दर महिन्याला अधिक पैसा बहिणींना मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे बहिणींचा संसार चांगला होईल याकडे शासन लक्ष देत आहे,पहिले सरकार हे लेना बँक होती आता ही देना बँक आहे त्यामुळे महिलांनी निश्चित राहावे पूर्वीचे सरकार अडीच वर्ष होते मात्र कोणत्याही प्रकारची विकास काम करू शकली नाही मात्र आम्ही गेल्या अडीच वर्षात सर्व ठिकाणी विकासाची कामे करून सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याची काम केले आहे लाडकी बहीण योजना, लाडकी बेटी, युवा वर्गासाठी,ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांसाठी सुद्धा महायुती शासन योजना विविध प्रकारच्या राबवत आहोत. मोफत शिक्षण व तीन सिलेंडर गँस योजणे मुळे विरोधक गँसवर आहेत.येत्या काळात भिवंडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,भिवंडीकरांना चांगले रस्ते,चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू ठाण्याच्या धरतीवर भिवंडी चा सर्वांगीण विकास करून हे शहर स्वच्छ व सुंदर केले जाईल, प्रदूषण मुक्त, ट्राफिक मुक्त करणारा करण्याचा विशेष प्रयत्न आमचा असेल ठाण्याच्या सारखा भिवंडीचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना दिलासा देण्याचा काम आम्ही करू असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले त्यासाठी भिवंडीतील तीनही उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.