खेळाडूंनी चुणूकदार खेळून देशाचे नांव राष्ट्रीय स्तरावर उज्वल करावे – देवानंद थळे
भिवंडी ( प्रतिनिधी ) शालेय विद्यार्थी व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील जय कालिका माता क्रीडा नगरी कालवार येथे हुतात्मा शांताराम कालवार श्री समर्थ कालवा विवेक स्मृती कालवार चे संदेश म्हात्रे व आदेश म्हात्रे या आयोजकांच्या पुढाकाराने ” जिल्हाप्रमुख देवानंद थळे चषक कबड्डी ” स्पर्धा आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने कबड्डी संघाने सहभाग घेतला आहे.कार्यक्रमाचे समारोप समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


भिवंडी तालुक्यातील कालवार गाव येथील जय कालिका माता क्रीडा नगरीमध्ये ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत,13 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कबड्डी स्पर्धेत 62 संघानी सहभाग घेतला आहे.या स्पर्धेत यश प्राप्त करणारे खेळाडू व संघाला राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
या स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे, कृष्णकांत कोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,
शिवसेनेचे उपनेते अरुण पाटील,
शिवसेना(ठाकरे) जेष्ठ नेते कृष्णकांत कोंडलेकर,उपनेते विश्वास थळे,
कशेळीच्या सरपंच वैशालीताई थळे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच
विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,खेळाडू सुध्दा क्रिडानगरीत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कबड्डी हा लाल मातीतील खेळ म्हणून ओळखला जातो राज्य व राष्ट्रीय स्तरावर सुद्धा हा या खेळाला फार महत्त्व आले आहे त्यामुळे खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या देशाचे व राज्याचे नाव उज्वल करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी यावेळी व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या,
खेळाडूंनी या चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ खेळून राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा सन्मान मिळवावा असे आवाहन आमदार शांताराम मोरे यांनी याप्रसंगी केले,यावेळी इतरही मान्यवरांनी आपली मनोगत भाषण
केली.या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा स्वतंत्र बक्षीस व रोख रकमेचे पारितोषिक दिली जाणार आहेत.