भिवंडीत उपमुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत..
भिवंडी ( प्रतिनिधी ) संपूर्ण महाराष्ट्रात कबड्डी स्पर्धा होतात मात्र भिवंडी तालुक्यात सर्वात जास्त कबड्डी स्पर्धा होत असतात त्यामुळे भिवंडी कबड्डीचे माहेरघर म्हणून आता ओळखले जात आहे.कबड्डी हा मैदानी खेळ आहे त्याला सुध्दा आता क्रिकेट खेळाप्रमाणे ग्लॅमर मिळू लागले आहे. त्यामुळे चांगले खेळाडू निर्माण होत आहेत व आपल्या देशाचे नाव उज्वल करीत आहे असे गौरव उद्गगार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
शालेय विद्यार्थी व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील जय कालिका माता क्रीडा नगरी कालवार येथे हुतात्मा शांताराम कालवार,श्री समर्थ कालवार विवेक स्मृती कालवारचे संदेश म्हात्रे व आदेश म्हात्रे या आयोजकांच्या पुढाकाराने ” जिल्हाप्रमुख देवानंद थळे चषक कबड्डी ” स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी मध्यरात्री अचानकपणे कार्यक्रम ठिकाणी उपस्थितीत झाल्याने त्यांचे खेळाडू व उपस्थित प्रेक्षक नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे,उपनेते अरूण पाटील,शहरप्रमुख सुभाष माने,कशेळी गांव सरपंच वैशालीताई थळे यांनी शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
क्रिकेट प्रमाणे कबड्डी या स्पर्धेला सुद्धा महाराष्ट्रसह देश पातळीवर चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळत आहे,त्यातून चांगले खेळाडू निर्माण होत आहेत त्यामुळे प्रो कबड्डी,प्रो कबड्डी लीग सुरू झाली आणि आता व्यवसायिक कबड्डी स्पर्धा सुरू झाली त्यातून होतकरू खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळू लागले खेळाडू मध्ये असलेले चांगले टँलेंड ते सिध्द करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.राज्य शासन सुध्दा खेळाडूंच्या मागे उभी राहिली आहे. पुर्वी खेळाडू बक्षीस रक्कम कमी होती मात्र महायुतीचे सरकार येताच खेळाडूंना भरगोस रक्कम बक्षिस म्हणून देत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.खेळाडूंच्या कलागुणांना प्रोत्साहन व त्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळावी पाहिजे या भूमिकेतून सरकार खेळाडूंना मदत करत आहे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कबड्डी स्पर्धा खेळवल्या जातात त्यामुळे या खेळाला एक मोठे चांगले स्वरूप आले आहे. देवानंद थळे सारखे सामाजिक कार्यकर्ते हे खेळाडूंच्या मागे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देतात व खेळाडूंसाठी व्यासपीठ निर्माण करून देतात ही फार गौरवस्पद बाब आहे, यातील चांगले खेळाडू हे भिवंडी सह ठाणे जिल्ह्याचे नाव उज्वल करून देश पातळीवर खेळतील आणि आपल्या देशाचं नाव उंच करतील असा विश्वास यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून सर्व उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा होत असून या स्पर्धेत 62 होऊन अधिक कबड्डी स्पर्धा संघानी भाग घेतला आहे.
