स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे

भिवंडी

भिवंडी (भानुदास भसाळे ) आगामी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका या सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद सिद्ध करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्तेनी सज्ज 
रहावे असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले आहे.
         ते जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते.2024 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या,या निवडणुका नेत्यांच्या असताना नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली,आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या असतात त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी यांना बळ देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवून पुन्हा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे असे मत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी व्यक्त केले. लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो असा दावा महायुतीने केला असला तरी ईव्हीएम घोटाळ्यामुळेच महायुतीचा विजय झाला आहे, गरजू व एक वेळचे जेवणही न मिळणाऱ्या खऱ्या गरजू लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित ठेवून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करीत ठरावीक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला असा आरोप करीत महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून त्याचा फटका महिलांना बसत आहे.काँग्रेसच्या सरकारचे काम व महायुतीच्या सरकारचे अपयश हे दोन्ही मुद्दे पदाधिकाऱ्यांनी आता लोकांपर्यंत नेणे गरजेचे असून या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकतीने लढवण्यावर भर देण्याची गरज असल्याची माहिती चोरघे यांनी दिली.
पक्षातील व महा विकास आघाडी मधील हेवेदावे बाजूला सारून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद व महापालिका निवडणुका ताकतीने लढवण्यावर भर देण्यात यावा असे आवाहन दयानंद चोरघे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *