भिवंडी ( प्रतिनिधी )जनतेने लोकसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी ची संधी दिली पण स्वतःचे अपयश लपवून जनतेची खोटी सहनभूती मिळवून टी आर पी वाढवण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे प्रयत्न भिवंडी चे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सुरू केले आहे.त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे जोरदार प्रतिउत्तर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे. प्रसंगी त्यांचे भाऊ
मनपाचे माजी सभागृह नेते सुमित पाटील हे सुद्धा उपस्थित होते.
बुलेट ट्रेन व स्व.मनोज म्हात्रे हत्याकांडात आमच्या कुटुंबियांवर केलेले आरोप हे बालिशपणाचे असून अब्रू नसलेल्या व्यक्तीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल न करण्याची भूमिका आमची आहे.अशी प्रतिक्रिया
देवेश पाटील यांनी यावेळी दिली आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पात आमच्या कुटुंबियां विरोधात खोटे दस्तऐवज बनवून पैसे घेतले या खासदार सुरेश म्हात्रे यांच्या आरोपाचे खंडन करताना देवेश पाटील यांनी सांगितले की, याच प्रकरणात भिवंडी न्यायालयात सुरेश म्हात्रे यांच्या हस्तकाने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे हे सुरेश म्हात्रे विसरले आहेत.तर स्व.मनोज म्हात्रे यांची हत्या निंदनीय आहे.त्याचे समर्थन आम्ही कधीच केले नाही.या प्रकरणात पोलिसांनी तपास केला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन सुनावणी सुरू आहे.असे असताना आठ वर्षानंतर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न खासदार सुरेश म्हात्रे करीत आहेत हे चुकीचे आहे असे सांगत खासदार सुरेश म्हात्रे व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.वन खात्याच्या, नवीन शर्थीच्या जमिनीवर गोदाम बनवली आहेत. आम्ही स्वतः मुख्यमंत्री यांना विनंती करून भिवंडी तालुक्यातील सर्व अनधिकृत बांधकामाचा शोध घेण्याची विनंती करणार असल्याचे शेवटी देवेश पाटील व सुमित पाटील यांनी सांगितले आहे.
