भिवंडी ( प्रतिनिधी ) पाकिस्तानात घुसून तेथील अतिरेक्याचे तळ उध्वस्त करण्या साठी राबवण्यात आलेल्या “ऑपरेशन सिंदूर ” ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतीय सशस्त्र दल सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र भाजपाच्यावतीने सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे,याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी भिवंडीत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र सावंत व आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली धामणकर नाका इथून वाजत गाजत मोठ्या जल्लोषात तिरंगा यात्रा काढण्यात आली होती,या अभिनंदन यात्रेत हातात तिरंगा ध्वज घेऊन शेकडो पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला व नागरिक सहभागी झाले होते.


भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून धडा शिकवला आहे.या हल्यात अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करून पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काश्मीर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा सैनिकांनी बदला घेतला आहे.भारतीय नागरिकांचे रक्षण करणारे आपले सैनिक जवान यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करून मनोबल वाढवण्यासाठी भिवंडीत भाजपा पक्षाच्यावतीने तिरंगा सन्मानार्थ ही रॅली काढण्यात आल्याची माहिती आमदार महेश चौघुले यांनी यावेळी दिली.प्रसंगी भाजप अध्यक्ष रवींद्र सावंत, माजी अध्यक्ष अँड.हर्षल पाटील,मनपाने माजी नगरसेवक सुमित पाटील.
श्याम अग्रवाल,महिला अध्यक्ष सुनिता टावरे, ममता परमानी,
प्रेषित जयवंत,राजू गांजेगी,विशाल पाठारे,
भावेश पाटील यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी,महिला या रँलीत सहभागी झाले होते.धामणकर नाका येथील भाजपा पपक्ष मुख्य कार्यालया पासून सुरू झालेली ही सन्मान तिरंगा रॅली मुंबई आग्रा रोड महामार्गावरून स्व.आनंद दिघे चौक,
भिवंडी बस स्थानक,
वंजारपाटी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाली,
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून भारत मातेचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांचा जयजय काराच्या घोषणा देण्यात आल्या, यावेळी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी भाजपा पक्ष कार्यालयात झालेल्या पदग्रहन कार्यक्रमात माजी अध्यक्ष हर्षल पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाची सुंत्र नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या कडे पक्षाचे प्रदेश निरीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली.