वासिंदच्या वाढत्या लोकसंख्येनुसार
प्रवाशांना सुविधा देणार : कपिल पाटील

भिवंडी

रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे लोकार्पण

पडघा– ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील वासिंद गांव परिसराची वाढत्या लोकसंख्येनुसार रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्याचबरोबर भविष्यात लोकलच्या फेऱ्या निश्चितच वाढतील, असे आश्वासन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी झालेल्या कार्यक्रमात दिले.


      वासिंद रेल्वे स्थानकात उभारलेल्या रेल्वे पादचारी पुलाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख  अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य  काळुराम धनगर, राजेश तिवरे, विठ्ठल अधिकारी, प्रमोद तारमाळे आदींसह भाजपा कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती. रेल्वे स्थानकात उभारलेल्या पादचारी पुलाला तीन जीने असून, तो ६ मीटर रुंद आणि ४६ मीटर लांबीचा आहे.वासिंद रेल्वे स्थानकातील नव्या पादचारी पूलाचे आज शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या दोन्ही पुलांमुळे वासिंदवासियांना दिलासा मिळाला आहे.ठाणे,कल्याण-
डोंबिवलीतील घरांचे भाव वाढल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक टिटवाळा, वासिंद आणि शहापूर परिसरात कायमस्वरुपी वास्तव्यासाठी येत आहेत. त्यांची रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार प्रवाशांना सुविधा पुरविण्याची ग्वाही देतो. भविष्यात तिसरा व चौथा रेल्वेमार्ग झाल्यानंतरही लोकलची संख्या वाढेल, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री  कपिल पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *