भिवंडीत कारखाने बंद होत असल्याने कामगार हवालदिल
भिवंडी ( शरद भसाळे )देशात शेती क्षेत्रा नंतर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात यंत्रमाग उद्योग व्यवसायात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. भिवंडी,
मालेगाव,इचलकरंजी ही शहर यंत्रमाग उद्योगाची नगरी म्हणून ओळखले जातात. भिवंडी शहर परिसरात सुमारे दोन लाखाहून अधिक यंत्रमाग कारखाने आहेत. त्याच बरोबर कापडावर पूरक रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग हा व्यवसाय सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे.केंद्र सरकारने आयकर कायद्यातील कलम 43 B (H) या मध्ये केलेल्या बदलांमुळे यंत्रमाग व्यवसायिक सध्या हैराण झाले असुन अनेकांनी व्यवसायात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्यामुळे आपले यंत्रमाग बंद ठेवले आहेत.तर काही उद्योग व्यवसायिकांनी गुजरात सुरत शहरात धाव घेऊन आपला व्यवसाय तिथे सुरू केले आहे.त्यामुळे भिवंडीतील काही व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यंत्रमाग कारखाने बंद होत असल्याने कामगार वर्ग रोजगाराला मुकावे लागत आहे.या गंभीर प्रश्नाकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

यंत्रमाग कारखानदार व्यवसायिकांनी धागा
(सुत) खरेदी केल्या पासून त्यापासून कपडा निर्मिती करून तो 45 दिवसांमध्ये विक्री करून त्याचा व्यवहार पूर्ण केला पाहिजे अशी जाचक अट या नव्या आयकर विषयक कायद्यात नमूद आहे.त्याची अंमलबजावणी येत्या एक एप्रिल पासून होणार आहे.त्यामुळे यंत्रमाग उद्योग व्यवसायीक हैराण झाले आहेत.या अटी मुळे यंत्रमाग व्यवसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.त्यामुळे त्यांनी आपले कारखाने बंद करण्यास सुरवात केली आहे.त्यामुळे
कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.
धागा खरेदी नंतर वारपिंग अथवा सायझींग येथे धाग्याचे रोल अर्थात भीम बनविणे त्यानंतर यंत्रमाग कारखान्यात कपडा तयार होतो.त्यानंतर कच्चा कपडयावर डाईंग मध्ये रंग व इतर प्रक्रिया करून तो पक्का कपडा विक्री साठी तयार होतो.यामध्ये साधारण 80 ते 90 दिवसांचा कालावधी जात असून त्यानंतर विक्री केला जातो. यंत्रमाग व्यवसायात आर्थिक देवाणघेवाण व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर उधार होत असतात.त्यामुळे कपडा विक्री केल्यानंतर पैसे देण्याचा कालावधी सुध्दा मोठा असतो. 45 दिवसांच्या मुदतीत व्यवहार पूर्ण न केल्यास धागा खरेदी करणाऱ्यास त्या खरेदी किमतीवर आयकर भरावा लागणार आहे.जो तीस टक्के असणार असल्याने छोटे यंत्रमाग कारखानदार भयभीत झाले असून त्यांनी धागा खरेदी बंद करून कपडा उत्पादन थांबवले आहे.त्यामुळे कारखाने बंद होत असुन कामगार वर्ग बेरोजगार होत आहे.भिवंडीला यंत्रमाग व्यवसायाला याचा फटका बसला असून हजारो कारखाने बंद झाले आहेत.काही यंत्रमाग व्यवसायीक हे करारनामा करून भाडेतत्त्वावर मजूरी ने चालवत असल्याने छोटे यंत्रमाग कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.केंद्र सरकार व राज्य शासनाने या उद्योगास संजीवनी चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत यंत्रमाग उद्योग चालक संघटना पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.