भिवंडी (प्रतिनिधी )प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात केलेली प्रगती पुढे भविष्यात ही सुरू रहावी यासाठी ही निवडणूक महत्वाची असून,देशाचे भविष्य घडवणारी व देशाला दिशा देणारी,देशाला पुढे घेऊन जाणारी आहे त्यामुळे सर्वांनी आपले मतभेद दूर ठेऊन महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे महत्वाचे आहे असे मत शिवसेनेचे कल्याण चे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.

भिवंडीतील शांग्रिला रिसॉर्ट येथेशिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी व्यासपीठावर भाजप महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे,आ.विश्वनाथ भोईर,भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. भारत जोडो सभा कार्यक्रमात एकमेकांचे तोंड न पाहणारे विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी व्यासपीठावर एकत्र बसले होते.त्यांचे विचार देशाला घातक आहेत.बाळासाहेबांचे विचार गाडूनशिवतीर्थावर हिंदूद्वेषी मंडळींचे स्वागत करण्यात आले.ही सत्तेसाठी लाचारी आहे.अशी टीकाखा.श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर केली.महाराष्ट्रात अडीच वर्षात ठप्प असलेली विकासाची कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहेत.आता ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून मतदान करता येणार आहे.या संधीचा फायदा घेऊन मतदारांवर लक्ष केंद्रित करावे,प्रत्येक जागा जिंकणे महत्त्वाची आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून काम करायचे आहे असे आवाहन खा.शिंदे यांनी केले.राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकास काम मोठ्या प्रमाणात झाली असुन त्या विश्वासावर मला पुन्हा विजयी करून सेवा करण्याची संधी मतदार देतील असा विश्वास भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी उपनेते प्रकाश पाटील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सह मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.यावेळी वाडा तालुक्यातील विविध पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना शिक्षक सेनेचे मनीष पाटील यांनी केले.